जल प्रदूषण वर निबंध मराठी । Marathi Essay on Water Pollution

जल प्रदूषण वर निबंध मराठी । Marathi Essay on Water Pollution

प्रस्तावना :

आपल्या आजू- बाजूला आज प्रदूषणाने मोठे संकट पसरलेले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे जल, वायू आणि भूमी प्रदूषणाने संपूर्ण जगाला विळाखा घातला आहे.

आपल्या जीवनामध्ये सर्व सजीवांसाठी जगण्यासाठी पाणी असणे खूप गरजेचे आहे. फक्त पाणीच नव्हे तर ते पाणी शुद्ध असणे महत्त्वाचे आहे. आपल्या मानवी शरीराच्या वजनामध्ये सरासरी 60 टक्के पाणी असते.

यावरुन आपल्याला कळेल की, पाणी आपल्याला किती गरजेचे आहे. मानवा प्रमाणे या पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला आणि वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. काही वनस्पती तर 95 टक्के पाणी असते.

Table of Contents

आपल्या पृथ्वीवर पुरेश्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु त्यातील ताज्या पाण्याचे प्रमाणे हे फक्त २ ते ७ टक्के एवढीच आहे. व त्यातील फक्त ३ टक्के पाणी हे शुद्ध व पिण्यायोग्य आहे. तर काही पाणी हे समुद्र, हिमनदी व बर्फाळ शिखरे यांच्या स्वरूपात आहे. पण आज दिवसें दिवस हे पाणी दूषित होत आहे. आज मनुष्याला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते.

आजच्या निबंधामध्ये आपण जल प्रदूषण या विषयावर सविस्तर माहिती बघणार आहोत.

1) जल प्रदूषण म्हणजे काय ?

पाण्यात काही घातक व विषारी पदार्थ मिसळल्याने पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म पूर्णतः बदलतात व ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. आरोग्यासाठी हानिकारक होते किंवा त्याची क्षमता कमी होतो, यालाच ” जल प्रदूषण” असे म्हणतात.

जल प्रदूषणाची समस्या आज वाढतच जात आहे. व ही आज संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. WHO ( World Health Organization ) जागतिक स्वास्थ्य संघटनेच्या नुसार पिण्याच्या पाण्याचा Ph हा 7 ते 8 दरम्यान असला पाहिजे.

पण आज अनेक घातक रसायने पाण्यात मिसळल्याने पाण्यातील Ph चे प्रमाण कमी जास्त होत आहे. संपूर्ण पृथ्वी वरील जन जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे. मानव आणि इतर सजीव प्रजातींसाठी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे नद्या, तलाव, विहीर आहेत.

आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये स्वतःला शुद्ध करण्याची क्षमता असते. परंतु जेव्हा जल शुद्धीकरण्याच्या प्रक्रियेच्या वेगा पेक्षा जास्त वेग हा पाणी प्रदूषणाचा असेल तेव्हा जल प्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण होतात.

जेव्हा पाण्यामध्ये घातक आणि विषारी रसायने, प्राण्यांचे विष्ठा, अनेक घातक पदार्थ मिसळतात तेव्हा जल प्रदूषण होते आणि ह्याच कारणामुळे बहुतेक पाण्याचे स्त्रोत म्हणजे नदी, नाले, तलाव आणि समुद्र दूषित होतात. आणि ह्या दूषित पाण्याचा संपूर्ण जगावर घातक आणि वाईट परिणाम होत आहेत.

2) जल प्रदूषणाची कारणे :

जल प्रदूषणा मागे अनेक कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे,

– औद्योगीकरण, कारखान्यां मधून निघणारे घातक आणि विषारी रसायने नदी, तलाव मध्ये सोडले जाते यामुळे आज जल प्रदूषणाची समस्या वाढत आहेत.

– जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा पावसाच्या पाण्यात हवेतील धुळी कण आणि इतर विषारी पदार्थ मिसळतात. व हे पाणी नदी, नाले, तलावामध्ये जाते व प्रदूषण होते.

– तसेच आज बाजारात नव- नवीन अनेक प्रकारचे डिटर्जंट साबण, निरमा उपलब्ध आहेत. यांमध्ये विषारी पदार्थ असतात व ग्रामीण भागातील लोक यांचा वापर करून नदी, तलाव यांच्या किनाऱ्यावर कपडे धुतात व तेच पाणी पुन्हा नदीमध्ये जाते व जल- प्रदूषण होते.

– जल प्रदूषणा हे पाण्यामध्ये कोणताही प्रकारचा कचरा टाकल्यास पाण्यात घातक सूक्ष्मजीव निर्माण होतात व परिणामी पाणी दूषित होते ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही.

– आज जल मार्गद्वारे पेट्रोल, डिझेल, तेल यांसारख्या पदार्थांची देवाण घेवाण होते. आणि या आयात- निर्यात मध्ये कित्येकदा जहाजातील पेट्रोल अन्य रासायनिक पदार्थ समुद्रामध्ये गळतात. व यामुळे समुद्रातील पाणी दूषित होत आहे. जल प्रदूषणामुळे समुद्रातील जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

– आज जल प्रदूषणा सोबतच वायू प्रदूषण वाढत आहे. आणि या वारंवार वाढणाऱ्या वायु प्रदूषणामुळे ऍसिड पावसाचे प्रमाण वाढत आहे. ऍसिड पावसामुळे अनेक विषारी पदार्थ पाण्यात मिसळतात. ज्यामध्ये सिसा ( Pb ), कैडमियम ( cd ) आणि अनेक घातक पदार्थाचा समावेश होतो.

– जल प्रदूषणामुळे नदी, तलाव आणि समुद्र यांसारखे पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. पाण्यामध्ये राहणारे जलचर प्राणी व विविध प्रकारचे मासे यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेत.

3) जल प्रदूषणामुळे होणाऱ्या समस्या :

– वाढत्या जल प्रदूषणामुळे आज मानवाला आणि प्राण्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

– जर पाण्याचा एखादा स्त्रोत दुषित झाला असेल, तर त्या स्त्रोताच्या जवळपास राहणाऱ्या प्रत्येक जीवाला जल प्रदूषणाचा कोणता ना कोणता वाईट परिणाम होत असतो. तर पाणी मर्यादेपेक्षा जास्त दूषित झाले तर त्याचा परिणाम जीवावर सुद्धा बेततो.

– जल प्रदूषण ही समस्या पिकांसाठी सुद्धा नुकसान दायक व हानिकारक ठरत आहेत. जर पाणी दूषित असेल तर त्यामुळे शेतीच्या जमिनीला सुद्धा तेच दूषित पाणी मिळतो. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता ही कमी होते आणि जमीन नापीक होतो. म्हणून जल प्रदूषण ही कृषि क्षेत्राला धोकादायक ठरत आहे.

– तसेच जल प्रदूषणाचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे जल प्रदूषणामुळे समुद्रातील जीवांवर वाईट परिणाम होतो. जेव्हा समुद्रातील पाणी दूषित होते. तेव्हा समुद्रातील काही जीव मरतात तर काही जीव आजारी पडतात. आणि पाण्याची गुणवत्ता कमी होते.

– जेव्हा नदी, तलाव ह्या स्त्रोतांमधील पाणी दूषित होते आणि तेच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. तेव्हा त्यातून आपले आरोग्य खराब होते. साथीचे रोग, कावीळ, कॉलरा, उलट्या यांसारख्या रोगाला सामोरे जावे लागते.

– जल प्रदूषणाचा मोठा फटका हा कृषिक्षेत्राला होत आहे. जेव्हा दूषित पाणी आपण पिकांना देतो, तेव्हा त्या पिकांच्या उत्पादना मध्ये घट होऊन ती जमीन नापीक होते.

याचे उदाहरण म्हणजे आज जोधपूर आणि राजस्थान या सारख्या मोठ्या शहरातील रंगीत छपाई उद्योगातून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे तेथील आसपासच्या गावातील जमीन नापीक होत आहे. व 17 ते 30 टक्के उत्पादन घटत आहे.

अशा प्रकारे जलप्रदूषणामुळे आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.

4) जल प्रदूषणामुळे होणारे आजार :

आज जल प्रदूषणाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. जल प्रदूषणामुळे संपूर्ण जगाला विविध रोगांच्या समोरे जावे लागत आहे. जल प्रदूषणामुळे दररोज 14 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो.

दूषित पाणी पिल्याने मानवाच्या व पशु पक्ष्यांच्या स्वास्थ्याला एक धोका निर्माण झाला आहे. दूषित पाणी पिल्याने टायफाईड, कावीळ, कॉलरा सारखे आजार उद्भवत आहेत.

जर आपण दूषित झालेले पाणी पिले तर आपल्याला साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागेल. त्याच बरोबर त्वचेचे आजार, पोटाचे विकार, ताप आणि उलट्या होऊ शकतात. पावसाळा ऋतु मध्ये ह्या समस्या मोठ्या प्रमाणात होत आहेत.

जर हे जल प्रदूषण असेच वाढत गेले तर संपूर्ण जगाला विविध समस्यांना व आजारांना तोंड द्यावे लागेल. एवढेच नव्हे तर जलप्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढेल.

5) जल प्रदूषण रोखण्याचे उपाय :

जल प्रदूषण ही जागतिक पातळीची समस्या झाली आहे. जल प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिक प्रयत्न केले पाहिजे.

आपल्याला नदी, नाले, तलाव स्वच्छ ठेवली पाहिजेत कुठल्याही प्रकारचा कचरा हा पाण्यामध्ये जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.

आपल्या जवळपासच्या नदी आणि नाले स्वच्छ ठेवली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये पक्के नाले नसल्यामुळे तेथील पाणी कुठेही निघून जाते व जमा होते. त्यामुळे आपल्याला ग्रामीण भागात पक्के नाले बनवण्याची गरज आहे.

जल प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपल्याला सांडपाण्यावरील उपचारांच्या पद्धतीबद्दल सतत संशोधन करत राहिले पाहिजे. आपण दूषित झालेल्या पाण्यावर पुन्हा पुनर्चक्रीकरण करून शुद्ध करून वापरात आणले पाहिजे.

कारखान्यातील आणि उद्योग- धंद्यातून निघणारे विषारी आणि घातक पाणी नदी नाल्यात न सोडता त्या पाण्याचा योग्य निचरा केला पाहिजे.

नदीचे पाणी दूषित होता कामा नये यासाठी कठोर नियम व अटी लागू केल्या पाहिजे. विहीर, तलाव व इतर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतां मधून मिळणार्‍या पाण्याचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे.

जगातील प्रत्येक जागृक नागरिकाला पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. जल प्रदूषण कसे कमी करता येईल याची माहिती देऊन लोकांना जागृत केले पाहिजे.

आपल्याला पाणी टिकवून ठेवायचे असेल आणि आपल्या येणाऱ्या काळामध्ये जल प्रदूषण रोखायचे असेल, तर आपल्याला येणाऱ्या पिढीला पाण्याचे महत्व व प्रदूषण कमी करायचे उपाय सांगावे लागतील. यासाठी आपण शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • संत तुकाराम विषयी संपूर्ण माहिती 
  • ग्लोबल वॉर्मिंग चे दुष्परिणाम निबंध मराठी
  • उन्हाळी सुट्टी मराठी निबंध
  • साथीचे रोग यावर माहिती
  • भ्रष्टाचार वर मराठी निबंध

धन्यवाद मित्रांनो !

जल प्रदूषण वर १० ओळीत मराठी निबंध | 10 Lines on Water Pollution Essay in Marathi

10 Lines on Water Pollution Essay in Marathi: या ग्रहावरील जीवनाच्या अस्तित्वासाठी पाणी हे एक महत्त्वाचे साधन आहे. पृथ्वीवरील फक्त 1% पाणी पिण्यायोग्य आहे परंतु वाढत्या जलप्रदूषणामुळे स्वच्छ आणि स्वच्छ पाण्याचे स्त्रोत कमी होत आहेत. वाढत्या जलप्रदूषणामुळे जलचर प्राणी आणि आपल्या परिसंस्थेलाही जागतिक धोका निर्माण झाला आहे.

पाणी प्रामुख्याने मानवी क्रियाकलापांमुळे प्रदूषित होत आहे. कोणत्याही योग्य डिस्पोजेबल यंत्रणेशिवाय वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण पाणी प्रदूषित करत आहे आणि आपल्या ग्रहाच्या जैवविविधतेवर परिणाम करत आहे. जल प्रदूषणावर 10 ओळी, जल प्रदूषणावर 10 ओळी, जल प्रदूषण 10 ओळी, जल प्रदूषण 10 ओळी, 10 वाक्य निबंध, जल प्रदूषण वर निबंध, 10 Lines and Sentences on Water Pollution in Marathi

  • 1.1 10 Lines on Water Pollution Essay in Marathi SET 1
  • 1.2 10 Lines Marathi Essay on Water Pollution SET 2
  • 1.3 जल प्रदूषण १० ओळी मराठी निबंध
  • 1.4 10 Lines Essay on Water Pollution in Marathi SET 3
  • 1.5 10 Lines and Sentences on Water Pollution in Marathi Set – 4

जल प्रदूषण वर १० ओळीत मराठी निबंध

10 Lines Essay on Water Pollution in Marathi

10 Lines on Water Pollution Essay in Marathi SET 1

1- आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे, त्याचा दुरुपयोग करू नये.

२- आपण जो कचरा नदीत आणि तलावात टाकतो, त्यामुळे पाणी प्रदूषित होते.

3- कारखान्यांमधून निघणारा कचरा नद्या आणि तलावांमध्ये टाकला जातो, त्यामुळे पाणी प्रदूषित होते.

4- पाणी आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण आपल्या शरीराचा 60 ते 80 टक्के भाग पाण्याने बनलेला असतो.

5- वाढत्या लोकसंख्येमुळे जलप्रदूषणाची समस्या वाढत आहे.

6- जेव्हा हानिकारक रसायने पाण्यात मिसळतात तेव्हा ते पाणी खूप प्रदूषित करते जे आपण वापरू शकत नाही

7- जलप्रदूषणामुळे पाण्यात राहणाऱ्या पशु-पक्ष्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

8- जेव्हा आपण प्रदूषित पाणी पितो तेव्हा आपल्याला कॉलरा, आमांश यांसारखे अनेक गंभीर आजार होतात.

9- जलप्रदूषणाची समस्या जवळपास जगभर पाहायला मिळत आहे.

10- घरात आंघोळ करताना साबणाचा घाण व विषारी पदार्थ नाल्यातून नदीत व तलावात टाकल्यास जलप्रदूषणाची समस्या निर्माण होते.

10 Lines Marathi Essay on Water Pollution SET 2

1- एका शोधानुसार सर्वाधिक प्रदूषित नद्या आशिया खंडात आहेत.

2- समुद्रात घातक रसायने आणि कच्चे तेल पसरल्यामुळे समुद्रातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

3- पाण्यामध्ये राहणारे प्राणी नामशेष होण्याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचे प्रदूषण असे मानले जाते.

4- जर तुम्ही प्रदूषित पाणी झाडांवर आणि झाडांवर ओतले तर ते हळूहळू नष्ट होईल.

5- जेव्हा आपण आपल्या घरात ठेवलेल्या प्राण्यांना नदी किंवा तलावात आंघोळ घालतो तेव्हा जलप्रदूषणाची समस्या उद्भवते.

6- चेन्नईची कुर्मा नदी ही भारतातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाते.

7- पाणी प्रदूषित होत असल्याने आपल्या पिण्यासाठी योग्य असलेले पाणीही संपत चालले आहे.

8- जेव्हा आपण प्रदूषित नदी किंवा तलावात आंघोळ करतो तेव्हा त्याचे प्रदूषित पाणी आपल्या शरीरात प्रवेश करते, त्यामुळे आपल्या शरीराला अनेक आजार होतात.

९- जलप्रदूषणामुळे पाण्यातील सेंद्रिय आणि भौतिक व रासायनिक गुणधर्म खराब होत आहेत.

10- पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी आपण गावातील आणि शहरातील लोकांनी आपल्या घरातील कचरा योग्य ठिकाणी टाकला पाहिजे, जेणेकरून त्याचा पुन्हा वापर करता येईल.

जल प्रदूषण १० ओळी मराठी निबंध

जल प्रदूषणावर 10 ओळी आणि वाक्ये इयत्ता 1, 2, 3, 4, 5 आणि 6 च्या विद्यार्थ्यांसाठी काही संच अगदी सोप्या भाषेत खाली दिले आहेत. फक्त त्यामधून जा आणि जल प्रदूषणावर तुमच्या आवश्यक 10 ओळी मिळवा: जल प्रदूषण १० ओळी मराठी निबंध, 10 Lines Essay on Water Pollution in Marathi, 10 lines Marathi Essay on Water Pollution, 10 lines on water pollution in marathi

10 lines on water pollution in marathi

10 Lines Essay on Water Pollution in Marathi SET 3

 1. जलस्रोतांच्या दूषिततेमुळे जल प्रदूषण होते.

2. नद्यांमध्ये औद्योगिक कचऱ्याची थेट विल्हेवाट लावल्याने नदीचे पाणी विषारी होते.

3. घरगुती सांडपाण्यात गंभीर रोगजनक असतात जे नद्यांमध्ये सोडल्यास साथीचे रोग पसरवू शकतात.

4. खडक आणि मातीमध्ये आर्सेनिकसारखे जड धातू पाणी दूषित करतात आणि भूजल विषारी बनवतात.

5. कृषी कार्यात वापरल्या जाणाऱ्या खते आणि कीटकनाशकांचा भूपृष्ठावर तसेच भूजलावर परिणाम होऊ शकतो.

6. तेल गळती प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात क्रूड पेट्रोलियम समुद्रात सोडले जाते ज्यामुळे सागरी परिसंस्थेवर परिणाम होतो.

7. जलप्रदूषणामुळे कॉलरा, टायफॉइड, आमांश आणि विषबाधा यांसारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

8. WHO च्या अहवालानुसार, जलजन्य आजारांमुळे दरवर्षी सुमारे 842000 मृत्यू होतात.

9. जलप्रदूषणाविरुद्ध लढायचे असेल तर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे.

10. पाण्याचा अपव्यय थांबवणे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे आपल्याला पाणी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते.

You May Also Like✨❤️👇

10 lines Essay On Air Pollution In Marathi

10 Lines Essay on Jawaharlal Nehru in Marathi

10 Lines on Diwali in Marathi

10 Lines on Save Water Essay in Marathi

10 Lines Essay On Tree in Marathi

10 Lines On Good Habits In Marathi

10 Lines on Pollution in Marathi Essay

10 Lines on My Mother in Marathi

10 lines Holi Essay in Marathi For Students

10 Lines and Sentences on Water Pollution in Marathi Set – 4

1. पाण्यामध्ये अशुद्धता आणि विषारी रसायने प्रवेश केल्याने जल प्रदूषण होते.

2. औद्योगिक आणि मानवी कचऱ्याची विल्हेवाट हे जल प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे.

3. तलाव आणि नद्यांमधील प्लास्टिक कचऱ्यामुळे नदीचे पाणी घाण आणि विषारी झाले आहे.

4. धार्मिक विधी आणि मृतदेहांचे अवशेष यामुळे आपल्या पवित्र नद्या अत्यंत प्रदूषित झाल्या आहेत.

5. जलप्रदूषणाच्या वाढीमुळे केवळ मानवांवरच परिणाम होत नाही तर अनेक सागरी प्रजाती नष्ट झाल्या आहेत.

6. नदीच्या पाण्यात पाराचे जास्त प्रमाण सागरी प्रजातींच्या संप्रेरक बदलांवर विपरित परिणाम करते ज्यामुळे त्यांच्या वर्तनात मोठे बदल होतात.

7. नदीच्या पाण्यात वाढणारे रासायनिक घटक जलचर प्राण्यांद्वारे शोषले जातात ज्यामुळे संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होते.

8. नदीचे पाणी कधीकधी सिंचनासाठी वापरले जाते जे कृषी उत्पादनांना दूषित करते.

9. नद्या किंवा समुद्रातील कचऱ्याची थेट विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत.

10. साथीचे आजार पसरू नयेत यासाठी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता वेळोवेळी तपासली पाहिजे.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Water Pollution Information in Marathi Essay | Jal Pradushan in Marathi

jal pradushan marathi nibandh

Water Pollution in Marathi

Jal pradushan marathi essay project : जल प्रदूषण निबंध.

जल प्रदूषण म्हणजे जलाशयांचे साठे उदा. तलाव, नद्या, समुद्र, विहीर, कालवे, सरोवरे इत्यादींचे पाणी दुषित होणे होय. कारखान्यांचे रासायनिक दुषित पाणी नाल्यांद्वारे नदीपातत्रांत सोडले जाते, त्यामुळे जलप्रदूषण मोठया होताना दिसत आहे. या सर्व बाबींना माणूसच कारणीभूत आहे. अशाप्रकारच्या प्रदूषणामुळे मानवी जीवन मोठया धोक्यात येण्याची शक्यता आहे. जल प्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे.

जलप्रदूषणामुळे आज जगभरात प्रत्येक दिवशी १४,००० लोकांचा मृत्यु होत आहे. त्यात ५८० लोक भारतातून आहेत. चीनसारख्या मोठया देशातील ९०% पाणी प्रदूषित आहे आणि त्यातील १०% पाणीच पिण्यायोग्य आहे. वर्ष २००७ च्या अनुसार चीनमधील ५० लाखाहून अधिक लोक हे शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत.

१ रासायनिक पदार्थ पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण होते. २ सांडपाणी, कचरा, प्लास्टिकच्या वस्तू पाण्यात फेकल्याने जलप्रदूषणात वाढ होते. ३ जनावरे, कपडे, भांडी अशा अनेक वस्तू नदीच्या पाण्यात धुतल्याने सगळी घाण पाण्यात मिसळते. ४ शेतीत फवारली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके पाण्यात मिसळतात व पाणी प्रदूषण होते.

जलप्रदूषणावरील उपाययोजना – :

Water Pollution Project in Marathi Language Wikipedia / Mahiti Essay Nibandh

Related posts, 4 thoughts on “water pollution information in marathi essay | jal pradushan in marathi”, leave a reply cancel reply.

Website logo image

HealthMarathi

Feel better, live healthier.

Water pollution: पाणी प्रदूषण कारणे, परिणाम व उपाययोजना

water pollution essay in marathi

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)

जल प्रदूषण समस्या प्रस्तावना – Water pollution :

मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे अतिशय नुकसान झालेले आहे. त्यामुळेच पाणी, हवा, ध्वनी आणि मृदा प्रदूषणाच्या विविध समस्या आज निर्माण झाल्या आहेत. यापैकी जल प्रदूषणाची समस्या ही अधिक गंभीर मानली जाते. जल प्रदूषणामुळे मनवासह इतर सजीवांचे आरोग्य धोक्यात येत असते.

जल प्रदूषण रोखणे का आवश्यक आहे..?

जगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. फक्त 1 ते 1.5 % च पाणी पिण्यायोग्य आहे. कारण पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी जवळजवळ 98 % पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरुपात आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी जपुन वापरणे गरजेचे तर आहेच त्याशिवाय पिण्यायोग्य पाण्यात प्रदुषके मिसळण्यापासून थांबवणेसुद्धा गरजेचे आहे.

जल प्रदूषण म्हणजे काय..?

काही कारणामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेमध्ये बदल झाल्याने ते पाणी पिण्यासाठी अपायकारक बनते. अशा पाण्याला प्रदूषित पाणी असे म्हणतात. जल प्रदूषणामध्ये पाण्याचे विविध स्त्रोत म्हणजे नदी, तलाव, धरणे, विहिरी वैगेरे यातील पाणी प्रदूषित होत असते. या समस्येला ‘जल प्रदूषण’ असे म्हणतात.

जलप्रदुषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, काविळ, विविध ताप, विसूचिका (Cholera), यासरखे रोग उत्पन्न होतात.

जलप्रदुषणाची कारणे (Causes of Water Pollution) :

जल प्रदूषण समस्येसाठी मानवच सर्वस्वी जबाबदार आहे. वाढते शहरीकरण, कचरा व सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, औद्योगिककरण अश अनेक कारणांद्वारे जल प्रदुषण होत असते.

जलप्रदुषणाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडणे,
  • सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याणे,
  • रासायनिक खते, किटकनाशके पाण्यात मिसळल्याने,
  • पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने,
  • कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,
  • जमिनीवर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पावसाचे पाणी जाऊन ते दूषित पाणी वाहत जाऊन नदीमध्ये मिसळल्याने,
  • जनावरे, कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धुतल्याने,
  • मृत जनावरे नदीत टाकल्याने,
  • अंत्यसंस्कारानंतरची राख किंवा इतर धार्मिक कार्यातील निर्माल्य, नैवेद्य वैगेरे नदीमध्ये टाकणे,
  • रासायनिक रंगकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मुर्त्यांच्या विसर्जनामुळे,
  • जहाजातून खनिज तेलाची वाहतूक करताना गळतीमुळे समुद्राच्या पाण्यावर तेलाचे तवंग निर्माण झाल्याने समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण होते.

जल प्रदुषणाचे परिणाम (Water pollution effects) :

  • जलप्रदुषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण) , उलटी , काविळ , विविध ताप, टायफॉइड , विसूचिका (Cholera) यासरखे विविध साथीचे रोग उत्पन्न होतात.
  • दूषित पाण्यात डासांची पैदास होऊन डेंग्यू , मलेरिया सारखे आजार होतात.
  • रासायनिक पदार्थ युक्त दूषित पाणी सेवन केल्यास त्यांचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या किडन्यांवर होतो. किडन्या निकामी होणे , कॅन्सर यासारखे गंभीर आजार उत्पन्न होतात.
  • पाण्यातील जलचर प्राणी, पाण्यातील वनस्पती यांचे आरोग्य धोक्यात येते.
  • समुद्रातील पाण्याचे प्रदूषण झाल्यास समुद्रातील सजीवसृष्टी धोक्यात येते.

जल प्रदूषण उपाययोजना :

जल प्रदुषण थांबवण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक असते. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात.

  • कचरा व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
  • औद्योगिक घटकांना मार्गदर्शक सुचना करणे, त्यांना रासायनिक पदार्थ पाण्यात टाकण्यापासून अटकाव करणे.
  • औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उद्योगात सक्तीचा करावा.
  • सेंद्रिय शेतीचा वापर करणे. शेतामध्ये रासायनिक खते, किटकनाशके यांचा मर्यादित वापर करणे.
  • धार्मिक कार्यातील निर्माल्य, नैवेद्य, राख वैगेरे नदी पाण्यात टाकणे टाळावे.
  • शेडूमातीच्या मुर्ती आणि नैसर्गीक रंग वापरुन सणांचा सात्विक आनंद घेणे. जल प्रदूषण थांबवण्यासाठी यासारखे उपाय करणे आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा.. वायू प्रदूषण विषयक माहिती जाणून घ्या.

Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.

water pollution essay in marathi

Dr. Satish Upalkar

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

cropped-krushi-davandi-logo-image.png

  • जल प्रदूषण मराठी माहिती: उद्दिष्टे, विश्लेषण, समस्या, कारणे, कार्यपद्धती

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण जल प्रदूषण मराठी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये जल प्रदूषण उद्दिष्टे (Water Pollution Objectives). जल प्रदूषण विश्लेषण मराठी माहिती (Water Pollution Analysis Marathi Information), जल प्रदूषण समस्या (Water pollution problem in Marathi), जल प्रदूषण महत्व, जल प्रदूषण कारणे मराठी माहिती (Causes of Water Pollution Marathi Information), जल प्रदूषण कार्यपद्धती माहिती (Information on water pollution procedures in Marathi) इत्यादी सविस्तर माहिती या लेखात तुम्हाला मिळणार आहे.

जल प्रदूषण मराठी माहिती: उद्दिष्टे, विश्लेषण, समस्या, कारणे, कार्यपद्धती

Table of Contents

जल प्रदूषण उद्दिष्टे

जलप्रदूषणाचे निराकरण करण्याच्या उद्दिष्टांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण: जलप्रदूषणाचा सामना करण्याच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे. दूषित पाण्यामुळे कॉलरा, आमांश, विषमज्वर यांसारखे विविध आजार आणि आजार होऊ शकतात.
  • पर्यावरणाचे संरक्षण: जलप्रदूषणाचा जलीय परिसंस्थेवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे जैवविविधता नष्ट होऊ शकते आणि नैसर्गिक अधिवासांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पर्यावरण आणि जलीय परिसंस्थेवर अवलंबून असलेल्या विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जलप्रदूषणावर उपाय करणे आवश्यक आहे.
  • नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन: पाणी हा एक मौल्यवान नैसर्गिक स्त्रोत आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी या संसाधनाचे जतन करण्यासाठी जल प्रदूषणावर उपाय करणे आवश्यक आहे.
  • आर्थिक विकास: आर्थिक विकासासाठी स्वच्छ पाणी आवश्यक आहे, विशेषतः कृषी, पर्यटन आणि उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये. त्यामुळे आर्थिक विकास आणि वाढीसाठी जलप्रदूषणावर उपाय करणे आवश्यक आहे.
  • नियमांचे पालन: पाण्याच्या गुणवत्तेचे आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी असलेल्या नियमांचे आणि कायद्यांचे पालन करण्यासाठी जलप्रदूषणाला संबोधित करणे देखील आवश्यक आहे.
  • हवामान बदलाचे शमन: जलप्रदूषण हवामान बदलास हातभार लावू शकते आणि त्यास संबोधित करणे जलीय परिसंस्थेवरील हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यास मदत करू शकते.

जलप्रदूषणाला संबोधित करण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे, नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, आर्थिक विकासास समर्थन देणे, नियमांचे पालन करणे आणि हवामानातील बदल कमी करणे हे आहेत.

  • वायू प्रदूषण मराठी माहिती: प्रस्तावना, महत्व, उद्दिष्टे, कारणे, उपाय योजना

जल प्रदूषण विश्लेषण मराठी माहिती

जल प्रदूषण विश्लेषणामध्ये पाण्याच्या शरीरातील प्रदूषकांचे प्रकार आणि स्त्रोत, प्रदूषणाचे संभाव्य परिणाम आणि प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कोणत्याही विद्यमान उपायांची प्रभावीता यांचा समावेश आहे. जल प्रदूषण विश्लेषणाचे काही प्रमुख घटक येथे आहेत:

  • प्रदूषक ओळखणे: जल प्रदूषण विश्लेषण पाण्यातील प्रदूषक, जसे की रसायने, पोषक घटक, गाळ आणि सूक्ष्मजीव ओळखण्यापासून सुरू होते. या प्रदूषकांचे स्रोत, जसे की औद्योगिक विसर्जन, कृषी प्रवाह किंवा सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे देखील ओळखली जातात.
  • परिणामांचे मूल्यांकन: पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर जलप्रदूषणाच्या संभाव्य परिणामांचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये पाण्याची कमी झालेली गुणवत्ता, जलचर वस्ती आणि परिसंस्थेचे नुकसान आणि जे लोक पाणी पिण्यासाठी किंवा करमणुकीसाठी वापरतात त्यांच्या आरोग्याचे धोके यांचा समावेश असू शकतो.
  • प्रदूषण पातळी मोजणे: जल प्रदूषण विश्लेषणामध्ये पाण्यातील प्रदूषकांची पातळी मोजणे, पाण्याचे नमुने आणि प्रयोगशाळा विश्लेषण यासारख्या तंत्रांचा वापर करणे समाविष्ट आहे. हे मोजमाप परिमाणवाचक डेटा प्रदान करतात ज्याचा वापर प्रदूषणाची व्याप्ती आणि तीव्रता मोजण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • नियंत्रण उपायांचे मूल्यमापन: सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे किंवा प्रदूषण नियंत्रण नियमांसारख्या कोणत्याही विद्यमान नियंत्रण उपायांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन केले जाते. प्रदूषण पातळी कमी करण्यावर आणि पाण्याच्या गुणवत्तेचे संरक्षण करण्यावर त्यांच्या प्रभावाचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे.
  • विकसनशील उपाय: विश्लेषणाच्या आधारे, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उपाय विकसित केले जातात. यामध्ये नवीन नियंत्रण उपाय अंमलात आणणे, विद्यमान सुधारणे किंवा प्रदूषक डिस्चार्ज कमी करण्यासाठी नवीन नियम विकसित करणे समाविष्ट असू शकते.
  • देखरेख प्रगती: अंमलात आणलेल्या कोणत्याही उपायांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि उद्भवणारे कोणतेही बदल किंवा नवीन समस्या ओळखण्यासाठी मॉनिटरिंग महत्वाचे आहे. नियमित देखरेख डेटा देखील प्रदान करते ज्याचा वापर प्रदूषण नियंत्रण उपाय सुधारण्यासाठी आणि सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो.

जलसंस्थेतील प्रदूषणाचे स्वरूप आणि प्रमाण समजून घेण्यासाठी आणि ते नियंत्रित करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी प्रभावी धोरणे विकसित करण्यासाठी जल प्रदूषण विश्लेषण आवश्यक आहे.

जल प्रदूषण समस्या

जल प्रदूषण ही एक महत्त्वाची समस्या आहे जी जगभरातील अनेक प्रदेशांना प्रभावित करते. जल प्रदूषणाशी संबंधित काही प्रमुख समस्या येथे आहेत:

  • प्रदूषणाचे स्रोत: औद्योगिक विसर्जन, शेतीतून वाहून जाणारे पाणी, सांडपाणी आणि सांडपाणी आणि वादळाच्या पाण्याचा समावेश असलेल्या विविध स्रोतांमधून जल प्रदूषण होऊ शकते. हे स्त्रोत विविध प्रकारचे प्रदूषक, जसे की रसायने, पोषक घटक, रोगजनक आणि गाळ, पाण्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात.
  • मानवी आरोग्यावर परिणाम: जलप्रदूषणामुळे दूषित पाणी पिणाऱ्या किंवा वापरणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जीवाणू, विषाणू आणि विषारी रसायने यांसारख्या प्रदूषकांच्या संपर्कामुळे आजार आणि रोग होऊ शकतात, विशेषत: मुले आणि वृद्धांसारख्या असुरक्षित लोकांमध्ये.
  • पर्यावरणीय प्रभाव: जलप्रदूषणाचा मासे, उभयचर प्राणी आणि अपृष्ठवंशी प्राण्यांसह जलीय परिसंस्थेवर आणि त्यांच्या रहिवाशांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. पोषक आणि इतर प्रदूषकांच्या उच्च पातळीमुळे अल्गल ब्लूम्स आणि ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे जलचरांना हानी पोहोचू शकते.
  • आर्थिक प्रभाव: जलप्रदूषणाचे महत्त्वपूर्ण आर्थिक परिणाम देखील होऊ शकतात, विशेषतः स्वच्छ पाण्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांसाठी, जसे की शेती, मासेमारी आणि पर्यटन. जलस्रोतांच्या दूषिततेमुळे जल प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी खर्च वाढू शकतो.
  • हवामान बदल: हवामान बदलामुळे पूर आणि दुष्काळ यांसारख्या अत्यंत हवामानाच्या घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढवून जल प्रदूषण समस्या वाढवत आहे, ज्यामुळे जलस्रोतांचे प्रवाह आणि प्रदूषण वाढू शकते.

जलप्रदूषण ही एक जटिल आणि बहुआयामी समस्या आहे ज्याला नियंत्रित करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी सर्वसमावेशक धोरणांची आवश्यकता आहे. या धोरणांमध्ये सांडपाणी प्रक्रिया आणि वादळाच्या पाण्याचे व्यवस्थापन सुधारणे, औद्योगिक आणि कृषी विसर्जन कमी करणे आणि पाण्याच्या गुणवत्तेचे संरक्षण करण्यासाठी नियम आणि धोरणे लागू करणे यांचा समावेश असू शकतो.

  • जमिनीची धूप म्हणजे काय: प्रकार , कारणे, उपाययोजना | Soil Erosion in Marathi

जल प्रदूषण कारणे मराठी माहिती

जल प्रदूषण विविध मानवी आणि नैसर्गिक घटकांमुळे होऊ शकते. जलप्रदूषणाची काही सामान्य कारणे येथे आहेत:

  • औद्योगिक विसर्जन : औद्योगिक क्रियाकलाप जसे की उत्पादन, खाणकाम आणि ऊर्जा उत्पादन जलमार्गांमध्ये जड धातू, रसायने आणि तेलांसह अनेक प्रदूषके सोडू शकतात.
  • कृषी क्रियाकलाप: कीटकनाशके आणि खतांचा वापर यासारख्या कृषी पद्धतींमुळे पोषक आणि रसायने पाण्याच्या शरीरात वाहून जाऊ शकतात. पशुधनाच्या ऑपरेशन्समधील प्राण्यांचा कचरा देखील जलमार्गांमध्ये जीवाणू आणि इतर रोगजनकांचा प्रवेश करू शकतो.
  • सांडपाणी आणि सांडपाणी: घरे आणि व्यवसायातील सांडपाणी आणि सांडपाणी यामध्ये बॅक्टेरिया, विषाणू आणि रसायनांसह अनेक प्रकारचे प्रदूषक असू शकतात. योग्य प्रकारे उपचार न केल्यास, हे प्रदूषक जवळपासचे जलस्रोत दूषित करू शकतात.
  • जमीन वापरण्याच्या पद्धती: जंगलतोड, शहरीकरण आणि बांधकाम यासारख्या जमिनीच्या वापराच्या पद्धतींमुळे जलमार्गांमध्ये धूप आणि अवसादन वाढू शकते, ज्यामुळे जलचरांना हानी पोहोचते आणि पाण्याची गुणवत्ता कमी होते.
  • सागरी क्रियाकलाप: नौवहन, तेल ड्रिलिंग आणि मासेमारी यांसारख्या सागरी क्रियाकलापांमुळे समुद्रात तेल आणि इतर प्रदूषकांची गळती होऊ शकते, ज्यामुळे सागरी जीवन आणि किनारी परिसंस्थांना हानी पोहोचू शकते.

जलप्रदूषण ही अनेक कारणांसह एक जटिल समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन आवश्यक आहे ज्यामध्ये अनेक स्त्रोतांकडून होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उपायांचा समावेश आहे. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया सुधारणे, औद्योगिक आणि कृषी विसर्जन कमी करणे आणि पाण्याच्या गुणवत्तेचे संरक्षण करण्यासाठी नियम आणि धोरणे लागू करणे समाविष्ट असू शकते.

जल प्रदूषण कार्यपद्धती माहिती

जल प्रदूषण प्रक्रिया जल प्रदूषण संबोधित करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी उचललेल्या पावलांचा संदर्भ देते. जलप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या काही सामान्य प्रक्रिया येथे आहेत:

  • देखरेख: प्रदूषणाचे स्रोत ओळखण्यासाठी आणि पाण्याच्या गुणवत्तेतील बदलांचा मागोवा घेण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. यामध्ये पाण्याचे नमुने गोळा करणे आणि प्रदूषकांच्या श्रेणीसाठी त्यांचे विश्लेषण करणे समाविष्ट असू शकते.
  • सांडपाणी प्रक्रिया: सांडपाणी प्रक्रियेमध्ये सांडपाणी जलाशयांमध्ये सोडण्यापूर्वी त्यातील प्रदूषक काढून टाकणे समाविष्ट आहे. सेंद्रिय पदार्थ, पोषक घटक आणि रोगजनक यांसारख्या प्रदूषकांना काढून टाकण्यासाठी उपचारांमध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रियांचा समावेश असू शकतो.
  • वादळाच्या पाण्याचे व्यवस्थापन: वादळाच्या पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये वादळातून होणारे प्रवाह नियंत्रित करणे आणि जलमार्गांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रदूषकांचे प्रमाण कमी करणे समाविष्ट आहे. यामध्ये झिरपणारे फुटपाथ, हिरवी छत आणि पावसाच्या बागांचा वापर करून वादळाचे पाणी पकडणे आणि फिल्टर करणे यासारख्या उपायांचा समावेश असू शकतो.
  • स्त्रोत नियंत्रण: स्त्रोत नियंत्रणामध्ये प्रदूषकांचे त्यांच्या स्त्रोतावर सोडणे कमी करणे किंवा काढून टाकणे समाविष्ट आहे. यामध्ये औद्योगिक आणि कृषी क्रियाकलापांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती लागू करणे, बांधकाम साइट्सवरून होणारे प्रवाह नियंत्रित करणे आणि घरे आणि व्यवसायांमध्ये हानिकारक रसायनांचा वापर कमी करणे यांचा समावेश असू शकतो.
  • नियम आणि धोरणे: ज लप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी नियम आणि धोरणे ही प्रभावी साधने असू शकतात. यामध्ये पाण्याच्या गुणवत्तेसाठी मानके लागू करणे, जलमार्गांमध्ये सोडण्यासाठी परवानग्या आवश्यक आणि पालन न केल्याबद्दल दंड स्थापित करणे यांचा समावेश असू शकतो.

सार्वजनिक शिक्षण आणि पोहोच: जल प्रदूषण आणि त्याचे परिणाम याबद्दल लोकांना शिक्षित करणे जागरूकता वाढविण्यात आणि प्रदूषण कमी करणार्‍या वर्तनांना प्रोत्साहन देण्यास मदत करू शकते. यामध्ये प्रदूषण कमी करणाऱ्या घरगुती पद्धतींची माहिती देणे समाविष्ट असू शकते, जसे की कमी पाणी वापरणे आणि घरगुती रसायनांची योग्य विल्हेवाट लावणे.

एकंदरीत, जलप्रदूषणाला संबोधित करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन आवश्यक आहे ज्यामध्ये विविध स्त्रोतांचे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक प्रक्रियांचा समावेश आहे. मानवी आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी प्रभावी जल प्रदूषण प्रक्रिया आवश्यक आहेत.

  • लसूण लागवड माहिती मराठी: फायदे, जाती, लागवड पद्धत, किड व रोग व्यवस्थापन
  • Agneepath Yojana in Marathi: Online Apply Date, Online Form, कागदपत्रे

1 thought on “जल प्रदूषण मराठी माहिती: उद्दिष्टे, विश्लेषण, समस्या, कारणे, कार्यपद्धती”

' src=

माझ्या घरापाठी विहीर आहे. त्यामागील जमिनीतील मालकाने घर व संडास व सेफ्टीक टॅन्क बांधले आहे. विहिरीपासुन सेफ्टीक टॅन्क २५ फुटांवर आहे. विहीर उतारावर आहे. ग्रामपंचायत व आरोग्य अधिकारी यांनी तक्रार देऊन देखील संडास व सेफ्टीक टॅन्क यास परवानगी दिली या गोष्टीस ६ वर्षे झाली. भविष्यात विहीर मलमूत्र उतरून निकामी होणार आहे. काय करावे याचे मार्ग दर्शन करावे. स्थळ- चिंदर खरी वाडी, तालुका: मालवण, जिल्हा: सिंधुदुर्ग ४१६६१४

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

जल प्रदूषणा विषयी संपूर्ण माहिती

Water Pollution Information in Marathi

विश्वाला भेडसावत असलेली समस्या ती म्हणजे प्रदूषण, प्रदूषणामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, आणि निसर्गाला त्रास होणे म्हणजेच अप्रत्यक्षपणे पृथ्वीवर राहणाऱ्या सजीवांना. प्रदूषणाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे मागच्या काही लेखांमध्ये आपण मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण , यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहिली,

आजच्या लेखात आपण प्रदूषणाचा राहिलेला प्रकार, जो कि जल प्रदूषण आहे, तर आज जल प्रदूषणाविषयी माहिती पाहणार आहोत, आशा करतो मागील लेखाप्रमाणे हा लेख सुद्धा आपल्याला आवडणार. तर चला पाहूया.

जल प्रदूषणा विषयी संपूर्ण माहिती – Water Pollution Information in Marathi

Water Pollution Information in Marathi

सर्वप्रथम आपण पाहूया कि प्रदूषण म्हणजे काय तर,

प्रदूषण म्हणजे काय? – Meaning of Pollution

प्रदूषणामुळे पर्यावरणाला जी हानी पोहचते, त्याला आपण प्रदूषण म्हणतो, आजच्या काळात प्रदूषणाला कमी करण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रदूषणाला मुख्यता तीन प्रकारांमध्ये विभागल्या गेले आहे, ते असे जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण . त्यांनतर मृदा प्रदूषण आणि बाकी प्रदूषणाचे प्रकार येतात. तर आजच्या लेखात आपण जल प्रदूषणाविषयी माहिती पाहणार आहोत,

जल प्रदूषण म्हणजे काय? – Jal Pradushan Mhanje Kay

मानवी कृत्यांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेमध्ये झालेले बदल, आणि तेच जेव्हा पाणी सजीवांच्या पिण्यायोग्य राहत नाही तेव्हा जे प्रदूषण होते त्या प्रदूषणाला “जल प्रदूषण” म्हणतात.

जल प्रदूषणाची कारणे आणि परिणाम – Causes of Water Pollution

जल प्रदूषण घडण्यामागे काही कारणे आहेत, ते खालीलप्रमाणे.

  • जेव्हा कारखान्यातील उत्सर्जित अपशिष्ट कार्बनी पदार्थ मलवाहिन्यांतून नदी, समुद्र, आणि इतर पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळतात तेव्हा पाण्याचे प्रदूषण होते, जलाशयातील सजीवांना या कार्बनी पदार्थांमुळे यामुळे ऑक्सिजन ची कमतरता भासते आणि त्यांची मृत्यू होते.
  • जेव्हा शेतामध्ये काही रसायने फवारली जातात, तेव्हा त्या रसायनांचा काही अंश हा जमिनीत राहतो, आणि हीच रसायने जमिनीच्या माध्यमाने पिण्याच्या पाण्यात येऊन आपल्यासाठी हानिकारक बनू शकतात.
  • सांडपाणी आणि मलमुत्र यामुळे सुद्धा जलप्रदूषणाचा सामना करावा लागतो. जेव्हा मानवी वस्तीमधील मलमूत्र आणि सांडपाणी नदी आणि तलावात मिसळते तेव्हा ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही सोबतच आणि ते पाणी चुकून पिण्यात आले तर त्यामुळे जठर आणि पोटाच्या आतड्यांचे आजार होतात.
  • बरेचदा खनितेल समुद्राच्या मार्गाने ने आण केल्या जाते तेव्हा त्यातील काही तेलाच्या टाकी गळतात तेव्हा ते खनिज तेल समुद्राच्या पृष्ठभागावर जमा होते आणि यामुळे समुद्रातील सजीव मरण पावतात, सोबतच समुद्रातील वनस्पती सुद्धा नष्ट होतात.

जल प्रदूषणावर उपाय – Solution of Water Pollution

  • जेव्हा कारखान्यातील उत्सर्जित अपशिष्ट कार्बनी पदार्थ बाहेर टाकायला येतात तेव्हा त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करून बाहेर टाकावे जेणेकरून बाहेरील पर्यावरणाला त्याची हानी होणार नाही.
  • शेतांमध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात सेंद्रिय खते आणि शेणखताचा वापर होईल तेवढे चांगले. जेणेकरून होणारे पाण्याचे प्रदूषण थांबवता येईल.
  • मानव वस्तीमधील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. आणि पाण्यात सोडण्यापूर्वी त्यावर विशेष क्रिया करून नंतर सोडावे.
  • खनिज तेलांच्या गळतीमुळे होणाऱ्या जल प्रदूषणावर उपाययोजना आखणे.
  • पिण्याच्या पाण्याचे परीक्षण करणे आणि नंतर पिण्यासाठी वापरणे.
  • किरणोत्सारी अपशिष्टांना पाण्यात सोडण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवण्याच्या पद्धतींवर भर देणे.

तर आशा करतो आपल्याला जल प्रदूषणावर लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us! .

Editorial team

Editorial team

Related posts.

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

Koyna River Information in Marathi

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

गेटवे ऑफ इंडिया माहिती

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Gateway of India Mahiti मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स,...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

जल प्रदुषण वर मराठी निबंध Best Essay On Water Pollution In Marathi

Best Essay On Water Pollution In Marathi जल प्रदूषण म्हणजे दूषित किंवा अप्रत्यक्ष  प्रदूषित करणारे प्रदूषक किंवा प्रदूषकांचे मिश्रण थेट किंवा अप्रत्यक्ष निर्जारेद्वारे (समुद्र, तलाव, नद्या, महासागर, भूगर्भीय इ.) एकत्रित करणे म्हणजे संपूर्ण पर्यावरणाच्या घटनेला कारणीभूत ठरते आणि संपूर्ण जीवमंडळ (मानव, प्राणी, वनस्पती आणि जीवित प्राणी) प्रभावित करतात.

जल प्रदुषण वर मराठी निबंध Essay On Water Pollution In Marathi

सतत वाढणारी मानवसंख्या पिण्याचे पाणी, धुणे, औद्योगिक प्रक्रिया करणे, पिकांचे सिंचन करणे, जलतरण तलावांची व्यवस्था करणे आणि इतर पाणी-क्रीडा केंद्रासाठी अधिक पाण्याची मागणी वाढवते.

असे प्रदूषण करणारे पाणी भौतिक, रासायनिक, थर्मल आणि जैविक गुणधर्मांमध्ये बदल करीत असतात आणि जीवनाच्या बाहेर तसेच पाण्याबाहेर प्रतिकूल परिणाम करतात.

आपण प्रदूषित पाणी, हानिकारक रसायने आणि इतर प्रदूषक पदार्थ आपल्या शरीरात घालतो आणि शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य कमी होते आणि आपले आयुष्य धोक्यात घालते.

असे हानिकारक रसायने देखील प्राण्यांचे आणि वनस्पतींचे जीवन मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणतात. जेव्हा वनस्पती त्यांच्या मुळांद्वारे गलिच्छ पाणी शोषून घेतात तेव्हा ते वाढतात आणि मरतात.

जल प्रदूषणांचे परिणाम प्रकार आणि पाण्यावरील प्रदूषणाच्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी बदलतात. पिण्याचे पाणी घटणे आवश्यक तात्पुरती प्रतिबंधक पद्धत आवश्यक आहे जी पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचा योग्य समज आणि समर्थन द्वारे शक्य आहे.

Essay On Water Pollution In Marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा ,धन्यवाद .

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Doordarshan Essay In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Srushti Tapase

Leave a comment cancel reply.

water pollution essay in marathi

Marathi Delight

जल प्रदूषण प्रोजेक्ट मराठी | Jal Pradushan project in marathi

Jal Pradushan project in marathi compress

नमस्कार मंडळी,

Jal Pradushan project in marathi- मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण जल प्रदूषण प्रोजेक्ट मराठी मध्ये बघणार आहोत. जल प्रदूषण, जल प्रदूषण प्रोजेक्टची उद्दिष्टे, जल प्रदूषणाची कारणे, आणि जल प्रदूषणामुळे होणारे परिणाम याविषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये आज आपण बघणार आहोत. आजच्या संपूर्ण लेखातली माहिती ही Jal pradushan project in marathi यावर असणार आहे. तुम्हाला ही माहिती हवी असल्यास या लेखामधून तुम्ही कॉपी ही करू शकतात. Jal pradushan project in marathi सजीवांवर झालेले विपरीत परिणाम किंवा येणाऱ्या काळात होणारे परिणाम यांचे स्रोत ओळखण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी, येणाऱ्या काळामध्ये जल प्रदूषण थांबविण्यासाठी आणि जल प्रदूषणावर प्रतिबंधित उपाय सुचविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरू शकतो. 

Table of Contents

jal pradushan project in marathi prastavana

जलप्रदूषण म्हणजे नेमके काय? बरं, जेव्हा हानिकारक पदार्थ आपल्या जलमार्गात प्रवेश करतात आणि वनस्पती, प्राणी आणि अगदी स्वच्छ पाण्यावर अवलंबून असलेल्या आपल्या मानवांसाठी गोष्टी बिघडवतात. हे पदार्थ बऱ्याच वेगवेगळ्या स्त्रोतांमधून येऊ शकतात, जसे की रसायने टाकणारे कारखाने, कीटकनाशके आणि खते वाहून नेणाऱ्या शेतातून वाहून जाणे, किंवा अगदी नियमित लोक त्यांचा कचरा तिथे फेकतात. यालाच जलप्रदूषण असे म्हणतात.

जल प्रदूषण प्रोजेक्ट मराठी | Jal Pradushan project in marathi 

नद्या, सरोवरे, भूजल आणि महासागर यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये जेव्हा काही हानिकारक पदार्थ, दूषित पदार्थ किंवा प्रदूषक येतात, म्हणजेच जेव्हा शुद्ध पाण्यामध्ये अशुद्ध असणारे घटक मिसळतात आणि हे घटक सजीवांच्या जीवाला हानिकारक असते, तेव्हा जल प्रदूषण झाले असे आपण म्हणू शकतो. जल प्रदूषण ही एक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय समस्या आहे आणि जल प्रदूषणामार्फत झालेले प्रदूषण याच्यामुळे जलचर, परिसंस्था आणि मानवी आरोग्यावर अधिक परिणाम होऊ शकतात.

प्रदूषण म्हणजे काय | Jal Pradushan project in marathi 

प्रदूषण म्हणजे हानिकारक किंवा दूषित पदार्थ हे जेव्हा नैसर्गिक वातावरणात जाऊन मिसळतात आणि त्याच्या सजीवांवर किंवा मानवी जीवनवर प्रतिकूल परिणाम  हाऊ लागतो त्यालाच प्रदूषण असे म्हणतात.

प्रदूषणाचे प्रकार | Types of Pollution in Marathi

प्रदूषणाचे चार प्रकार आहेत त्यापैकी जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण हे मुख्य प्रकार आहेत.

जल प्रदूषण – Jal Pradushan | Water Pollution in Marathi

रसायने ,सांडपाणी ,जोडधातू, कृषी प्रवाह आणि प्लास्टिक यांसारख्या प्रदूषकांचं नद्या, त्याला, धन्य, समुद्र, महासागर, भूजल हे जल स्रोत दूषित होतात.

वायु प्रदूषण | Air Pollution in Marathi

हवेमधील हानिकारक पदार्थ जसे की पार्टिक्युलेट मॅटर, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे किंवा किंवा औद्योगिक प्रक्रिया आणि जळणारे जीवाश्म इंधन यांचा समावेश होतो नैसर्गिक वातावरणात होतो तेव्हा हवय मार्फत घाण प्रदूषण होऊन मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागतो. Jal Pradushan project in marathi या बरोबरच आपण वायु प्रदूषणावर पण निबंध वाचू शकता.

ध्वनी प्रदूषण | Sound Pollution in Marathi

अतिरिक्त असणाऱ्या आवाजामुळे नैसर्गिक पर्यावरणात नको ते वातावरण निर्माण होते आणि यामुळे मानवी जीवनावर किंवा वन्यजीवावर त्याचा परिणाम होऊ लागतो.

मृदा प्रदूषण | Soil Pollution in Marathi

अयोग्य कचऱ्याची विल्हेवाट, कीटकनाशके आणि कृषीमध्ये केला जाणारा खतांचा वापर यामुळे वनस्पतीवर विपरीत परिणाम होऊन मानवी जीवनावर त्याचे परिणाम दिसू लागतात.

जल प्रदूषणाचे संवर्धन महत्त्व | Conservation Significance of Water Pollution in Marathi

पाणी हा अतिशय रोजच्या वापरातला अतिशय महत्त्वाचा  घटक आहे आणि यामुळे आपण सर्वांनी पाण्याचे संरक्षण करणे अधिक गरजेचे आहे. आजच्या जगात पाणी हे अतिशय मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे. पाण्याचे संवर्धन न केल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. जल म्हणजेच पाणी, पाणी हे अपायकारक तेव्हा बनते, जेव्हा पाण्यामध्ये हानिकारक असलेले पदार्थ, अशुद्ध सांडपाणी जाऊन मिसळते तेव्हा हे पाणी दूषित होऊन ते अपायकारक बनते. अशा वेळेस पाण्याचे तापमान, पाण्याची पारदर्शकता, पाण्याचा रंग किंवा पाण्याची चव वेगळी लागणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. पुढे Jal Pradushan project in Marathi या लेखामध्ये वाचा.

पृथ्वीवर सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे, आणि उर्वरित 29 टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे परंतु यामध्ये तीन टक्के गोड पाणी आणि नऊ टक्के क्षारयुक्त पाणी उपलब्ध आहे. तीन टक्के गोड पाण्यामधून 2.1% पाणी हे बर्फाच्या स्वरूपात उंच पर्वतांवर शिखरांवर जमा झालेले आहे आणि यातून आश्चर्य करणारी बातमी म्हणजे 0.9 एवढेच पाणी नद्या, धरणे, तलाव, विहिरी या ठिकाणाहून सजीवांना हे पाणी पिण्यास उपयुक्त आहे. पृथ्वीतलावर एवढे कमी गोड पाणी असूनही ह्या पाण्याचा वापर  रासायनिक खतांमध्ये, कारखान्यांमध्ये किंवा विविध प्रकारचा कचरा या सर्वांमुळे पाणी दूषित  होऊ लागते आणि ह्या दूषित पाण्याचा मानवी  जीवनावर  विपरीत परिणाम होऊ लागतो. 

जल प्रदूषणाची व्याख्या | Jal Pradushan meaning

Jal Pradushan project in marathi- चांगल्या पाण्यामध्ये म्हणजे पृथ्वीतलावर असलेल्या गोड्या पाण्यामध्ये, मिसळलेले विषारी घटक, कारखान्यातील सांडपाणी, अशुद्ध द्रव्य, अधिक दुर्गंधी असलेले द्रव्य पाण्यात जाऊन मिसळता आणि यामुळे जल प्रदूषण निर्माण होते, या सर्वांचा परिणाम पृथ्वीतलावर असलेले सजीव, म्हणजेच मानव, प्राणी, जलचर आणि पृथ्वीतलावर असलेले अजून काही जीव यांच्यावर होताना दिसत आहे. वरील Jal Pradushan project in Marathi मजकुरामध्ये ही व्याख्या दिली आहे.

जल प्रदूषण प्रोजेक्टची उद्दिष्टे | Objectives of Water Pollution Project in Marathi

  • जल प्रदूषणावरील उपाय
  • जल प्रदूषणास कारणीभूत असलेले घटक
  • मानवी जीवनात पाण्याचे महत्व
  • जल प्रदूषणामुळे  होणारे सजीवांवर विविध परिणाम
  • जल प्रदूषणा बद्दल अधिक माहिती
  • जलसंवर्धन कसे करायचे,
  • जल व्यवस्थापनाच्या पद्धती कुठल्या असू शकतात.
  • जल प्रदूषणाची कारणे 
  • जल प्रदूषणाचे स्रोत
  • जल प्रदूषणाबद्दल जागृतता 
  • Jal Pradushan project in Marathi

जल प्रदूषण प्रोजेक्टची ही मुख्य उद्दिष्टे असून जल प्रदूषणापासून आपण कसे वाचू शकतो हे Jal Pradushan project in Marathi या संपूर्ण लेखात दिले गेले आहे. 

जल प्रदूषणाची कारणे | Causes of water pollution in Marathi

जल प्रदूषण म्हणजेच नद्या, तलाव, महासागर, भूजल व अगदी पिण्याचे पाणीही, पिण्याच्या पाण्याचे जल स्रोत आणि अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे जलस्रोत दूषित होतात, आणि याचा परिणाम हा मानवी तसेच सजीव जीवनावर होत असतो. हे सर्व मानवी जीवनाद्वारे केल्या जाणाऱ्या क्रिया आणि नैसर्गिक प्रक्रियेद्वारे घडत असते. जल प्रदूषण हे मानवनिर्मित आणि नैसर्गिक निर्मित असू शकते.

Causes of water pollution in Marathi compress

जल प्रदूषणाची कारणे पुढील प्रमाणे,

कचऱ्याची विल्हेवाट | Waste disposal in Marathi

वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये, देशांमध्ये, राज्यांमध्ये केरकचरा, सांडपाणी, मैल, घातक पदार्थ, रासायनिक द्रव्य, थेट जलकुंभामध्ये टाकणे किंवा ही सर्व द्रव्य जलाशयात जाऊन मिसळणे यामुळे पाणी दूषित होते. असे पाणी पिल्यास आरोग्यालाही  धोका निर्माण होण्याची संभावना असते. या पाण्याच्या विघटनामुळे पाण्यामध्ये कार्बन-डा-ऑक्साइडचे प्रमाण वाढते. कचऱ्यामध्ये आपण विविध प्रकारचा कचरा टाकत असतो त्यामध्ये आपण प्लास्टिक, काचेचे सामान या पद्धतीचा कचरा आपण टाकत असतो आणि ह्या  कचऱ्यामुळे पाण्याचे विघटन होत नाही. Jal Pradushan project in Marathi मध्ये पुढे वाचा.

हे दूषित पाणी महासागरास  जाऊन मिळते आणि या दूषित पाण्यामुळे बाष्पीभवनात अधिक अडथळे निर्माण होऊन पावसाचे प्रमाण कमी होऊन लागते. गावामध्ये किंवा शहरांमध्ये उघड्या असलेल्या गटारी यांचे सांडपाण्यावर अधिक किटके, माशा, डास यांचे प्रमाण वाढते आणि यामुळे रोगाच्याही प्रमाणात वाढ होऊ लागते. गटारी मधून  वाहणारे सांडपाणी आणि यामुळे पसरणारे रोग जसे की डेंगू, मलेरिया, टायफाईड, हिवताप  अशा विविध आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. अयोग्य पद्धतीच्या कचरा विल्हेवाट लावण्याचा प्रक्रिया मधून भूजल अधिक दूषित होताना दिसत आहे. 

कृषी उपक्रम | Agricultural activities in Marathi

शेतीमध्ये अधिक प्रमाणात खते, रासायनिक कीटकनाशकांचा वापर ,तणनाशकाचा वापर यासारखे रासायनिक द्रव्य शेती पद्धतीमध्ये वापरले जात असून जवळच्या जाळस्त्रोता मध्ये जाऊन मिसळतात. आधुनिक काळात शेतीसाठी कृत्रिम खतांचा अधिक वापर केला जात आहे. शेतामध्ये अधिक पीक येण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा आणि पिकावर लागलेली कीड यासाठी कीटकनाशकांचा अधिक प्रमाणे वापर करू लागले आहेत. लेखात Jal Pradushan project in Marathi मध्ये दिल्याप्रमाणे कृषि उपक्रम राबऊ शकतो.

यासारख्या कृषी पद्धतीमुळे ही रासायनिक खते आपल्याला अन्नाद्वारे तसेच जल स्त्रोताद्वारे वाहून जातात आणि ह्या वाहिलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये युटरिफिकेशन होते आणि या मार्फत पिण्याचे पाणी देखील अधिक प्रमाणात दूषित होते. या माध्यमातून  जलचर जीवांना आणि मानवाला अधिक प्रमाणात हानी पोहोचत आहे. फळे लवकर पिकवण्यासाठी त्यावर मारला जाणारा फवारा, उत्पादन लवकर होण्यासाठी शेतामध्ये केलेला जाणारा अधिक रासायनिक खताचा वापर यामुळे सुद्धा अधिक रोगराई पसरू लागली आहे. या सर्व प्रकारांवर आळा घालणे अधिक गरजेचे आहे. 

कारखान्यातील सांडपाणी व्यवस्थापन

Jal Pradushan project in Marathi मध्ये पुढे कारखान्यातील सांडपण्याबद्दल आणि त्याच्या व्यवस्थापणबद्दल बघूया. बहुतेक प्रमाणात कारखान्यातील सांडपाणी यामध्ये विषारी रसायने सेंद्रिय पदार्थ, जडधातू अशा काही विषारी पदार्थ बरोबरच प्रदूषके ही जवळच्या जल स्त्रोतांमध्ये सोडण्यात येतात. कारखान्यातील सांडपाण्याला औद्योगिक सांडपाणी असेही म्हटले जाते. विविध आणि अत्याधिक होणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक प्रक्रिया दरम्यान निर्माण होणारा द्रवकचरा किंवा घाणेरडा पद्धतीचा जलस्राव असलेल्या सांडपाण्यामध्ये बराच वेळा प्रदूषके रसायने याव्यतिरिक्त अजून दूषित द्रव पदार्थ, दूषित घटके यांचे बहुतेक प्रमाणात मिश्रण असते. ह्या रसायनांची, दूषित द्रव्यांची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्यास पर्यावरण संस्थेला आणि सजीवाला याचा मोठा प्रमाणात धोका उद्भवू शकतो.

कारखान्यातील सांडपाण्याची रचना ही कारखान्यातील असलेले उद्योग आणि त्या उद्योगावर केली जाणारी प्रक्रिया यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. कारखान्यातील या सांडपाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत जसे की तेल, वंगण, निलंबित घनपदार्थ, क्षार, आम्ल, विषारी द्रव्य किंवा काही जड धातू  उदा: शिसे, पारा अशा अनेक विषारी द्रव्यांचा कारखान्यातील सांडपाण्यामध्ये असतो. आणि हे पाणी थेट नद्या, धरणे, समुद्र, किंवा अजून काही असलेले पाण्याचे जलस्त्रोत आणि मातीमध्ये सोडले जातात.याची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्यास पर्यावरणावर अतिशय गंभीर असे परिणाम होऊ शकतात.

त्याचप्रमाणे हे जल प्रदूषके जेव्हा पिण्याच्या पाण्यात जाऊन हे मिसळतात त्यामुळे मानवाच्या जीवनावर ही याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. अलीकडे आपण बघत आहोत की बहुतेक देशांनी कारखान्यातील सांडपाण्याचे परवानगी घेऊन पाण्याची पातळी नियम ही बजावले आहेत आणि त्यानुसार औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषकांचे आपण करण्यात आलेले दिसून येते. हे नियम पर्यावरण वर आळा घालण्यासाठी तसेच सार्वजनिक सजीवांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांना नियंत्रित करण्यासाठी केले गेलेले आहेत. आणि या नियमांचे पालन करण्यासाठी कारखान्यांना अनेकदा औद्योगिक प्रदूषकांची विल्हेवाट लावताना या सांडपाण्याची प्रक्रिया करणे खूप गरजेचे असते. Jal Pradushan project in Marathi मध्ये पुढे बघूया.

कारखान्यातील होणाऱ्या सांडपाण्यामुळे औद्योगिक क्षेत्राजवळ निवास करणारी निवासांसाठी आरोग्यास अधिक धोका निर्माण होऊ लागतो. याचे कारण असे की कारखान्यातील सांडपाणी हे भूजल किंवा पिण्याचे पाण्याचे जलस्रोत दूषित करतात आणि यामुळे आरोग्यास धोका होण्याची संभावना आहे. औद्योगिक कचरा आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी हे मानवी जीवनात आणि नैसर्गिक पर्यावरणास अधिक धोकादायक असू शकतात.

कारखान्यातील सांडपाण्याचे  योग्य नियोजन न केल्यास किंवा त्या सांडपाण्याचे प्रक्रिया न करता जलस्रोतामध्ये सोडल्यास अधिक प्रमाणात जल प्रदूषण निर्माण होऊ शकते.

महानगरपालिकेचे सांडपाणी

शहरांमध्ये अधिक लोकसंख्या असते आणि यामुळे पाण्याचा वापर ही अतिशय जास्ती प्रमाणात होत असतो. यामुळेच येथील सांडपाण्यावर अयोग्यरीत्या प्रक्रिया केल्यास पाणी दूषित होऊ शकते. शहरातील सांडपाण्यामध्ये सेंद्रिय पदार्थ, रोग पसरवणारे घटक, विषारी पदार्थ अधिक प्रमाणात असतात आणि हे पाणी जवळच्या जलस्रोतामध्ये जाऊन मिसळल्यास जल प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागते. याचा परिणाम मानवावर किंवा आपल्या आजूबाजूच्या नद्यांमध्ये असणारे छोटे छोटे जलचर यावर होऊ लागतो. महानगरपालिकेचे सांडपाण्यावर योग्यरीत्या प्रक्रिया करूनच हे पाणी जलस्रोतांमध्ये सोडले पाहिजे यामुळे जल प्रदूषणाचे संकट टाळू शकते. Jal Pradushan project in Marathi च्या माध्यमातून आणखी काही करणे बघूया.

समुद्रामध्ये किंवा महासागरात जहाजे, टँकर किंवा ऑफशोअर ड्रिलिंग प्लॅटफॉर्ममधून काही चुकीच्या माध्यमातून झालेल्या अपघातातून किंवा दुसऱ्या काही हेतूने तेलगळतीमुळे समुद्रामध्ये अधिक परिणाम होऊ शकतात. सागरी किनाऱ्यावर तेल गळती झाल्यामुळे समुद्रामध्ये असणारे जलचर किंवा सागरी किनारपट्टीवर असलेली वसाहत यांच्यावरही तेलगळतीचा परिणाम होताना दिसतो. समुद्रामध्ये  होणाऱ्या जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस माशांची ही संख्या असंख्य प्रमाणात घटत चालली आहे.

बहुतेक वेळा सागरामध्ये खनिज तेलाचे टँकर फुटून तेल गळती होऊन अधिक प्रमाणात जल प्रदूषण जल प्रदूषण होऊ लागते आणि ह्या तेलगळतीमुळे असंख्य जलप्राणी तिथेच मृत्युमुखी पडतात. समुद्राच्या किनारी बहुतेक प्रमाणात तेल शुद्धी करण्यासाठी अनेक कारखाने उभारलेली आहेत आणि या कारखान्यांमध्ये रसायने समुद्रात जाऊन मिळतात. ह्या रसायनमध्ये विषारी पदार्थ, रासायनिक द्रव्य असलेली पदार्थ समुद्रात जाऊन मिळाल्यानंतर अधिक प्रमाणात जल प्रदूषण होऊन सजीवांना याचा मोठ्या प्रमाणात धोका भविष्यात उद्भवू शकतो. Jal Pradushan project in Marathi कच्या माध्यमातून आणखी काही जल प्रदूषणाची करणे बघूया. खनिज तेल म्हणजे पेट्रोल निर्मिती याचेही काम सागरी किनाऱ्यावरच केले जाते तेव्हा हे खनिज तेल सागरास जाऊन मिळते आणि याप्रमाणे जल प्रदूषण निर्मिती होते. 

प्लास्टिक प्रदूषण

प्लास्टिक प्रदूषण हे, आपण ज्या एकेरी प्लास्टिक वस्तूंचा वापर करतो आणि त्याची योग्य विल्हेवाट लावत नाही, परिणामी हे प्लास्टिक जाऊन जलस्रोतामध्ये मिसळते आणि जल प्रदूषणाचा धोका वाढतो.प्लास्टिक हे पाण्यामध्ये मिसळले जात नाही आणि त्यामुळे प्लास्टिक मुळे जल प्रदूषण होऊ लागते. बऱ्याच वेळा प्लास्टिकचे पदार्थ हे एखाद्या ठिकाणी अडकून जल प्रदूषण करू लागते. प्लास्टिक मुळे जल प्रदूषण झाल्यास समुद्रामध्ये अधिक प्रमाणात हानी होते.

Plastic Pollution in marathi compress

खानकामामुळे भूजलावर अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते. खान कामांमध्ये पाण्याचा गाळ, विषारी पदार्थ, जडधातू पाण्याच्या साठ्यामध्ये येऊन जलस्रोतास अडथळे निर्माण करू शकतात आणि यामुळे भूजलावरील पाण्यामध्ये अधिक प्रमाणात जल प्रदूषण होऊ लागते.

शहरातील पाणी

शहरांमध्ये पृष्ठभागावरून वाहणारे पावसाचे पाणी,जडधातू, तेल, प्लास्टिक, कचरा, केरकचरा हा जाऊन छोट्या छोट्या नाले किंवा नद्यांमध्ये जाऊन मिसळतो आणि यामुळे अधिक प्रमाणात जल प्रदूषण होऊ लागले आहे. 

जल प्रदूषण होण्यास असलेली नैसर्गिक कारणे | Natural causes of water pollution in Marathi

  • अति प्रमाणात होणारा पाऊस
  • सेंद्रिय पदार्थ पाण्यात जाऊन मिसळणे
  • ज्वालामुखी उद्रेक
  • शेवाळ फुटणे
  • चक्रीवादळ 

वरील सर्व घटना निसर्गाचा एक भाग असला तरी या सर्व घटनांमुळे पर्यावरणामध्ये बाधा येऊन जल प्रदूषणास आमंत्रित करतात. या सर्व घटनांचा जलप्रदूषणावर अधिक प्रमाणात प्रभाव पडताना दिसत आहे.

जल प्रदूषणावरील उपाय | Solutions to water pollution in Marathi

जल प्रदूषणावरील उपायांमध्ये जलस्रोतांचे प्रदूषण नियंत्रित करणे, रोखणे आणि जेवढे शक्य असेल तेवढे जलप्रदूषण कमी करणे या उद्देशाने आपण विविध धोरण राबवू शकतो. काही वेगवेगळ्या स्वरूपात कृती देखील आपण करू शकतो. जल प्रदूषण उपाय हे उपाय सरकारी धोरणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि वैयक्तिक प्रयत्नांपासून वेगवेगळ्या पद्धतीने जल प्रदूषणाचे उपाय आपण करू शकतो. जल प्रदूषणासाठी काही उपाय आपण नक्कीच करू शकतो ते Jal Pradushan project in Marathi मध्ये पुढील प्रमाणे, 

कारखान्यातील सांडपाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सांडपाणी निर्मिती कमी करण्यासाठी अधिक प्रमाणात उपाय केले पाहिजेत. जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि सजीव निर्मितीला आहे त्याचे परिणाम भोगावे लागणार नाही. कारखान्यातील सांडपाणीचा अनेक ठिकाणी प्रक्रिया करून पुनर्वापर केला जातो कारखान्यातील  सांडपाण्याची विल्हेवाट लावण्या अगोदर त्याची योग्यरित्या प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे. कारखान्यातील सांडपाण्याचे हानीकारक परिणाम कमी करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया (ETPs) सामान्यता वापरले जाते आणि हे प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा जलसोतांमध्ये सोडण्यापूर्वी किंवा औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरण्यासाठी आणि त्यातले प्रदूषक काढण्यासाठी किंवा निष्परिणामी करण्यासाठी रासायनिक, वनस्पती भौतिक, आणि जैविक प्रक्रियांचा वापर केला जातो. Jal Pradushan project in Marathi मध्ये पुढे वाचा.

हे सर्व कारखान्यांनी करण्याचे अधिक गरजेचे आहे. पाण्याचा वापर मर्यादित प्रमाणे करण्यासाठी किंवा मग पाण्याचा वापर कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात पाण्याचा पुनर्वापर केला जातो असे सर्वांनी केल्यास जल प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन पाण्याचा वापर मर्यादित प्रमाणात होईल. काही औद्योगिक क्षेत्रात अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो आणि या उपायोजनांमुळे जल प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास किंवा पर्यावरणातील परिणाम कमी होण्यास अधिक मदत मिळेल.काही छोटे छोटे उद्योग धंदे असतील त्यामध्ये होणारे सांडपाणी हे जवळच्या नदी नाल्यांमध्ये जाऊन मिसळते याची योग्य प्रमाणात विल्हेवाट लावल्यास जल प्रदूषणावर आळा  बसेल.

शहरांमध्ये असलेल्या नगरपालिकेचे पाणी किंवा घरगुती वापरत होणारे सांडपाणी हे थेट जल स्वतःमध्ये न सोडता प्रक्रिया करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावल्यास महत्त्वपूर्ण जल प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. आधुनिक काळामध्ये  पाण्यावर प्रक्रिया करून त्यातील दूषित घटके काढून त्या पाण्याचा पुनर्वापर करता येईल , आणि यामुळे पाण्याचा अतिवापर किंवा घाणेरड्या सांडपाणी यावर आळा बसेल, सागर किनाऱ्यावर वाहून जाणारे घातक पदार्थ, विषारी रसायने, जडधातू आणि होणारी तेलगळती यांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केल्यास जल प्रदूषण रोखण्यासाठी योग्य ती मदत होईल. पाण्याची गळती, ओव्हर फ्लो नळ, हे पृष्ठभागावरील पाण्याचा दूषित घटकांचा परिणाम रोखण्यासाठी नियमित प्रमाणे त्याचे चाचणी करणे अधिक आवश्यक आहे. त्यासाठी Jal Pradushan project in Marathi मध्ये दिल्याप्रमाणे विल्हेवाट करणे गरजेचे आहे.

नद्या आणि नाला लगतचे क्षेत्र यांना सुरक्षितता देणे म्हणजेच यामध्ये सोडले जाणारे दूषित पाणी हे प्रक्रिया केलेले असावे. सरकारने पाण्याचा योग्य वापर आणि पाण्याच्या गुणवत्तेचे नियम स्थापित केले पाहिजे यासाठी ज्या ठिकाणाहून अधिक प्रदूषके जल प्रदूषण करत आहेत जसे की काही छोटे-मोठे उद्योग ,नगरपालिका यांच्यासाठी आवश्यक ती मर्यादा स्थापन केली पाहिजे शहरी भागात होणारे रस्त्यांवर सांडपाणी किंवा इतर ठिकाणी होणारे सांडपाणी यावर सरकारने दंडात्मक कारवाई केली पाहिजे. 

जल प्रदूषण आणि त्यामुळे होणारे जल प्रदूषणाचे परिणाम यासाठी मानवाला वैयक्तिक जबाबदाऱ्यांचे जागरूकता करून देणे अधिक गरजेचे आहे. ह्या जागतिक स्तरावर जल प्रदूषणाचे अधिक महत्त्व समजून दिल्यास जल प्रदूषण यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळू शकतो. सुशिक्षित नागरिकांनी पाण्याच्या जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती पाऊल उचलणे अधिक गरजेचे आहे. सतत पाण्याचे संशोधन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केल्यास चांगल्या पाण्यातील दूषित घटके काढून टाकण्याचा अधिक चांगले कार्य होऊ शकते. 

वर Jal Pradushan project in Marathi madhye दिलेल्या जल प्रदूषणाचे उपाय हे व्यक्ती, सरकार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांनी जल प्रदूषण योग्यरीता हाताळल्यास भविष्यकाळात येणाऱ्या पिढीला स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जल प्रदूषण रोखणे अधिक महत्त्वपूर्ण काळाची गरज आहे. 

जल प्रदूषणाचे परिणाम | Effects of Water Pollution in Marathi

जल प्रदूषणाचे परिणाम मानवी आरोग्य, पर्यावरण, निसर्गक्षेत्र, जलचर, उभयचर, आणि अर्थव्यवस्थेवर जल प्रदूषणाचे अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात. जल प्रदूषणाचे परिणाम प्रदूषकांचे प्रकार आणि यावर पाण्याचे होणारे प्रदर्शन याचे परिणाम पुढीलप्रमाणे,

जलचर जीवनात हानी

जल प्रदूषणामुळे पाण्यात राहणारी जीव जसं की मासे, उभयचर यांचा मृत्यू अधिक प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि याचे कारण म्हणजे जल प्रदूषण होय. जल प्रदूषणामुळे विषारी रासायने पाण्यात जाऊन मिसळतात आणि पाण्यामध्ये प्रदूषके पसरून पाण्यात राहणारे जिवांवर त्याचा दुष्परिणाम होऊ लागतो. Jal Pradushan project in Marathi जल प्रदूषणामुळे पाण्यातील प्राणवायू कमी होऊन असंख्य मासे मृत्युमुखी होऊ लागतात. फक्त जलचरच नव्हे तर पाण्यातील वनस्पतीही जलप्रदूषणामुळे नष्ट होऊन लागतात. जलस्रोतांमध्ये होणाऱ्या दूषित घटकांच्या प्रवाहामुळे काही जलसरांच्या प्रजाती सुद्धा नष्ट होऊ लागल्या आहेत. दूषित पाण्याच्या प्रवाहामुळे जलचर प्राण्यांच्या प्रजनन संस्थेला धोका निर्माण होऊ लागला आहे. जलचर प्राण्यांची वाढ सुद्धा कमी होत चाललेले आहे.

पिण्याचे दूषित पाणी

जलप्रदूषणामुळे पिण्याचे पाणी दूषित होऊन सजीवांच्या वापरासाठी ते असुरक्षित होते, जल प्रदूषणामुळे गोड्या पाण्याच्या जलस्रोतांमध्ये दूषित पाणी जाऊन मिसळते आणि ह्या प्रदूषित पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, कॉलरा,  अमांश आणि हेपटायटस यासारखे जलजन्य  रोगांचा सामना करावा लागतो. Jal Pradushan project in Marathi पुढे वाचा.

आरोग्य समस्या

मानवनिर्मित क्रिया किंवा अन्नाद्वारे प्रदूषित असलेल्या पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवर पुरळ उठणे, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, श्वसन समस्या किंवा दीर्घकालीन आजार मानवी जीवनावर परिणाम करतात. बाहेर रस्त्यावर असणाऱ्या मल-मूत्राची पाणी हे अधिक प्रमाणात पाणी दूषित करते. हे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यावर आतड्यांचे  विकार, कावीळ ,अतिसार, डोकेदुखी अशा प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. जलप्रदूषणाच्या पाण्यामुळे मानवी जीवनावर त्याचा खूप मोठा परिणाम होताना दिसतो. आर्थिक परिणाम पुढे Jal Pradushan project in Marathi बघूया.

आर्थिक परिणाम

महत्वपूर्ण जलप्रदूषणाचे आर्थिक परिणाम  होऊ शकतात. दूषित असणारे जलस्रोत आणि औद्योगिक वापरासाठी सुरक्षित करण्यासाठी महागड्या प्रक्रियांची गरज भासू लागते. याव्यतिरिक्त जल प्रदूषणामुळे प्रदूषित पाण्याचा पर्यटन ठिकाणी अधिक परिणाम जाणवू लागेल. जलप्रदूषणामुळे मत्स्यपालन आणि इतर काही जे पाण्यावर आधारित उद्योग आहे त्यावर आर्थिक परिणाम होईल. 

जलस्रोतांचे नुकसान 

जल प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि यामुळे माती दूषित होऊन आणि सिंचनाचे पाणीही दूषित होऊन  नकारात्मक परिणाम घडतात. जल प्रदूषणामुळे पिण्या योग्य पाण्याची उपलब्धता कमी होऊन पाणी टंचाई सारखे परिणाम होऊ लागतात. पाणीटंचाई निर्माण झाल्यास रोजच्या वापरातील पाण्याची कमी जसे की स्वयंपाकासाठी लागणारे पाणी, स्वच्छता करणारे साठी लागणारे पाणी याव्यतिरिक्त अजून काही पाण्याच्या मूलभूत गरजा आहेत त्यावर जलप्रदूषणाचे परिणाम होऊ शकतात. Jal Pradushan project in Marathi च्या माध्यमातून आपण जल प्रदूषणाचे परिणाम जाणून घेतले आहेत.

मानवी सौंदर्याला परिणाम 

जल प्रदूषित पाण्यामध्ये अनेकदा पाण्यावर तरंगणारे मलबा, एकपेशीय वनस्पती आणि इतर काही प्रदूषकांमुळे पाण्याचा घाण वास येऊ लागतो हे पाणी वापरल्या नंतर मानवी जीवनावर पुरळ उठणे, अतिसार होणे अशा प्रकारच्या परिणामांना सामोरे जावे लागते आहे. Jal Pradushan project in Marathi हा प्रकल्प सुद्धा प्रदूषण कमी करणाऱ्या धोरणामध्ये मदत करतो.

शेतीमधून वाहणारे नायट्रोजन आणि फॉस्फरस यासारखे जास्त पोषक घटक आणि प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे जलस्रोतांमध्ये अल्गल ब्लूम्स होऊ शकतात. आणि या फुलांमुळे (अल्गल ब्लूम्स) ऑक्सीजनची ची पातळी कमी होऊ लागते. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर या ठिकाणी “डेड झोन” बनते. अशा ठिकाणी जलचर असंख्य प्रमाणात मृत्युमुखी होतात. 

जल प्रदूषण थांबविण्यासाठी एक बहुपर्यायी दृष्टिकोन असणे अतिशय आवश्यक आहे. ज्यामध्ये जलप्रदूषण थांबवण्यासाठी चे नियम, सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण उपाय,सार्वजनिक जागरूकता आणि अजून बहुपर्यायी पद्धतींचा समावेश करता येईल. नैसर्गिक पर्यावरणासाठी आणि मानवी जीवनातील भारतीय लोकसंख्या बघत असताना जलस्रोतांचे संरक्षण करणे अधिक महत्त्वपूर्ण बाब आहे. जल प्रदूषण रोखणे जनकल्याणासाठी पाण्याचे जतन करणे अधिक आवश्यक आहे.

जल प्रदूषण प्रकल्प निष्कर्ष | Jal Pradushan project in marathi  

Jal Pradushan project in marathi- जल प्रदूषण हे मानवासाठी आणि नैसर्गिक वातावरणासाठी अधिक घातक ठरत आहे. यामुळे सर्वत्र विविध प्रकारचे रोगराई पसरत आहे. या jal pradushan project in marathi प्रकल्पाद्वारे आपण जलप्रदूषणाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.  

  • जल प्रदूषण संवर्धन महत्त्व
  • जल प्रदूषणाचे परिणाम
  • जल प्रदूषणाचे कारणे

जलसंवर्धन, जल व्यवस्थापन, पाण्याची मूलभूत गरज आणि जल सुरक्षा आपल्याला कोणत्या प्रकारे करता येईल याची अधिक माहिती या जलप्रदूषण प्रकल्पाद्वारे आपण घेतले आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ’s

जल प्रदूषणाचे प्रकार.

भूजल प्रदूषण, पौष्टिक प्रदूषण, रासायनिक प्रदूषण, भौतिक प्रदूषण, पृष्ठभागावरील जलप्रदूषण, रासायनिक प्रदूषण, जैविक प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, गाळ प्रदूषण, किरणोत्सर्गी प्रदूषण, तेल आणि खनिज तेलाचे प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण,

प्रत्येक प्रकारचे जल प्रदूषण हे आपल्याला आव्हाने देत आहे आणि यावर आपण जल प्रदूषण नियंत्रित उपाय आणि जनजागृती करून जल प्रदूषणाच्या स्रोतावर प्रतिबंधित उपाय करू शकतो आणि जल प्रदूषण नक्कीच थांबवू शकतो.

जलप्रदूषण माहिती मराठी | Jal Pradushan mahiti 

जल प्रदूषण म्हणजे नद्या, नाले,समुद्र किंवा अजून काही पाण्याचे जल स्रोत यामध्ये विषारी पदार्थ, विषारी रासायने,  जडधातू, मिसळतात आणि दूषित करतात आणि यामुळे जल प्रदूषण निर्माण होते, ज्यामुळे पाण्याचे गुणवत्ता आणि पारदर्शकता कमी होऊन जल प्रदूषण निर्माण होते. मराठी डिलाइट च्या Jal Pradushan project in Marathi या लेखामध्ये तुम्ही आणखी माहिती मिळवू शकता.

जल प्रदूषण रोखण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते?

कचऱ्याची, कारखान्यांच्या दूषित पाण्याची, योग्य विल्हेवाट, विविध कृषि उपक्रम आणि जल संवर्धन आणि जल प्रदूषण या बाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करून आपण जल प्रदूषण थोड्या प्रमाणात रोखनण्यास मदत करू शकतो.

हे ही वाचा,

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of new posts by email.

जल प्रदूषणाची संपूर्ण माहिती Water Pollution Information In Marathi

Water Pollution Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण ह्या लेख मध्ये जल प्रदूषणाबद्दल मराठीत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही या लेखला शेवटपर्यंत वाचा. जेणेकरुन तुम्हाला पाण्याचे प्रदूषणाबद्दल संपूर्ण माहिती समजेल आणि तुम्ही त्या माहितीचा उपयोग तुमच्या कामासाठी करू शकतात.

चला तर जाणून घेऊया जल प्रदूषण बद्दल आणि ते थांबण्याच्या उपायांबद्दल तर तुम्ही खालील मुद्द्यांकडे पूर्ण लक्ष द्या. तुम्ही या लेखचा वापर तुमच्या माहितीसाठी सुद्धा करू शकता किंवा तुमच्या शालेय प्रयोगासाठी सुद्धा याचा वापर करू शकता.

Water Pollution Information In Marathi | पाण्याचे प्रदूषणाबद्दल मराठी संपूर्ण माहिती

जल प्रदूषण काय आहे what is water pollutionin marathi.

जेव्हा बाहेरील पदार्थ जे पाण्यामध्ये जाऊन मिसळून जातात आणि प्राकृतिक पदार्थ असे परावर्तित करून देते की मग ते पाणी पिण्यासारखे राहत नाही आणि ना ते पाणी आपल्या काही दुसऱ्या कामाचे असते. अशाप्रकारे पाणी हे आपल्या स्वास्थ्यावर हानिकारक प्रभाव टाकत असते. प्रदूषित पाण्याची उपयोगिता कमी होण्याच्या कारणाने त्या पाण्याचा उपयोगही खूप कमी केला जातो. यालाच आपण जल प्रदूषण म्हणत असतो.

पाणी जेव्हा प्रदूषित होते ते प्रदूषित होण्याचे कारण पाण्यामध्ये जनावरांचे घाण, विषारी औद्योगिक पदार्थ, घरांचा आणि कारखान्याचा कचरा, तेल आणि इतर पदार्थ पाण्यामध्ये जाऊन मिळून जातात. याच कारणाने स्वच्छ पाणी प्रदूषित होऊन जाते. याच कारणाने स्वच्छ पाण्याचे स्रोत जसे समुद्र, नदी इत्यादी प्रदूषणाचे शिकार होत आहेत. ज्याचा मनुष्य आणि इतर जीवांवर घातक प्रभाव पडत आहे.

जल प्रदूषणाचा अर्थ | Water Pollution Meaning

जल प्रदूषणाचे प्रकार | types of water pollution in marathi.

जल प्रदूषणाचे 3 मुख्य प्रकार आपल्या समोर ज्यांचे नाव खालील प्रमाणे आहेत.

2) जैविक जल प्रदूषण- जेव्हा पाण्यामध्ये वेगवेगळया प्रकारचे रोग पसरवणारे जीव प्रवेश करतात आणि पाण्याला इतका दूषित करून देतात की ते पाणी आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक होऊन जाते. त्याला जैविक जल प्रदूषण म्हणतात.

3) भौतिक जल प्रदूषण- जेव्हा भौतिक जल प्रदूषण होते. तर त्याच्या कारणामुळे पाण्याची जी गंध असते आणि जो स्वाद असतो. त्यामध्ये जे ऊष्मीय गुण असतात त्यामध्ये बदल होऊन जातो.

जल प्रदूषणाचा आपल्या जीवनावर प्रभाव

तर यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार पसरणे सुरू होऊन जातात आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या रोगांचा पसराव हळूहळू सुरू होतो. शरीराची त्वचा खराब होऊ लागते. ज्यामुळे आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जल प्रदूषणामुळे आपल्यावर शारीरिक आणि मानसिक परिणाम ही आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक रूपाने कमजोर वाटू लागते आणि कधीकधी या पाण्यामुळे व्यक्तीचा मृत्यूही होऊन जातो.

जल प्रदूषणाचे कारण

1) प्राकृतिक स्रोत

1) प्राकृतिक स्रोत – जल प्रदूषित होण्याचे अनेक कारणं असतात आणि जल प्रदूषण हे वेगवेगळ्या कारणामुळे होत असते. जसे जेव्हा खनिजे, वनस्पतींची पाने, बुरशी पदार्थ, मानवी आणि प्राण्यांचे मलमूत्र इत्यादी पाण्यात मिसळतात, तर प्राकृतिक रूपाने जल प्रदूषित होत असते. 

जेव्हा पाणी जमिनीवर जमा होऊन जाते आणि त्या जमिनीवर खनिज पदार्थ ची मात्रा जास्त होऊन जाते. तेच खनिज पाण्यामध्ये मिसळून जातात ज्याला विषारी पदार्थ म्हणतात. जर याची मात्रा जास्त होऊन जाते तर ते खूप घातक आणि खतरनाक ठरू शकते. या व्यतिरिक्त बेरीलियम, कोबाल्ट, निकिल, बेरियम, टिन, वैनेडियम, माॅलिब्डेनम, इत्यादी पदार्थही पाण्यामध्ये थोडे थोडे मिसळून जातात त्यामुळे जल प्रदूषण होऊन जाते.

जल प्रदूषणापासून वाचण्याचे उपाय

जल प्रदूषण सारख्या मोठ्या समस्या पासून वाचण्यासाठी तुम्हाला अनेक उपाय योजना करावे लागतात. तर जल प्रदूषणासाठी वाचण्याचे उपाय तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहेत

• आपल्या गल्लीतील नाल्यांना नेहमी साफसफाई करायला हवी जेणेकरून प्रदूषण नाहि होणार.

• प्रदूषित पाण्याला स्वच्छ बनवण्यासाठी नेहमी बदल केले गेले पाहिजे. तूम्ही स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.

• जलप्रदूषणासारख्या समस्येबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे.  त्याची कारणे, दुष्परिणाम आणि प्रतिबंध याबाबतची प्रत्येक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे.

जल प्रदूषण कसे होते?

जल प्रदूषण काय आहे.

-विषारी पदार्थ आणि दूषित पाणी जेव्हा नदी समुद्र आणि दुसऱ्या जल स्रोतांमध्ये येऊन विसरून जातात. त्यामुळे जल प्रदूषण होत जाते असे पदार्थ 3 मध्ये खाली बसून जातात आणि जमा होऊन जातात. त्यामुळे पाण्यामध्ये वेगवेगळे आजार पसरले जातात

जलप्रदूषण रोखण्यासाठीचे उपाय लिहा.

जलप्रदूषण टाळण्यासाठी नाले, विहिरी, तलाव, नद्या वेळोवेळी स्वच्छ करून त्या घाण करू नयेत.  याशिवाय जलप्रदूषणाशी संबंधित सर्व कायद्यांचे पालन करावे.

जलप्रदूषणामुळे कोणते रोग होतात?

जलप्रदूषणाचे स्त्रोत कोणते आहेत.

विषारी पदार्थ, खनिजे, वनस्पतींची पाने, बुरशी पदार्थ, मानव आणि प्राण्यांचे मलमूत्र हे जल प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत आहेत.

Leave a Comment Cancel reply

water pollution essay in marathi

पाणी मराठी निबंध | Water Essay In Marathi Best 100 Words

Water Essay In Marathi

या पोस्ट मध्ये पाणी मराठी निबंध लेखन | Water Essay In Marathi 100 शब्दांमध्ये करणार आहोत

Water Essay In Marathi

निबंध लेखन –  पाणी.

[मुद्दे : पाण्याला जीवन म्हणतात, एवढे पाण्याचे महत्त्व – पाणी निसर्गाची देणगी – म्हणून पाण्याची किंमत वाटत नाही पाण्याचा अभाव पाण्याविना शेती अशक्य – पाण्याचा प्रश्न जागतिक महत्त्वाचा पावसाचे पाणी जमिनीत मुखले पाहिजे.]

पाणी म्हणजेच जीवन! ‘जीवन’ या नावातच पाण्याचे महत्त्व दडलेले आहे. पाणी ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली भेट आहे. त्यामुळे पुष्कळ वेळा आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि मग आपल्याकडून पाण्याचा अपव्यय होतो. पाणी फार मौल्यवान आहे, ते जपून वापरले पाहिजे. पाणी नसले तर काय होईल, याची कल्पना दुष्काळातच येते.

तहान लागली असताना पाणी मिळाले नाही की, डोळ्यांत पाणी उभे राहते! खेडोपाडी पाण्यासाठी लोकांना डोक्यावर हंडे, कळश्या घेऊन अनेक मैल हिंडावे लागते. पाण्याविना शेती फुलत नाही. आता जगात सगळीकडेच पाण्याचा प्रश्न उभा आहे. कारण पृथ्वीवरील माणसांना आवश्यक आहे, एवढा पाण्याचा साठा उरला नाही.

पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खालावत आहे. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न हा पाणीसंचयाचाच भाग आहे. पाणी आपण वाचवले पाहिजे. ते जमिनीत मुरवले पाहिजे. तरच यापुढे माणसाचा टिकाव लागणार आहे.

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • जल पाणी मराठी निबंध दाखवा / Pani Marathi Nibandh Dakhva
  •  पाणीवर मराठी निबंध सांगा / Water Essay in Marathi 100 words
  • पाण्यावर मराठी निबंध लेखन / Essay on Water In Marathi 
  • हिरवी संपत्ती मराठी निबंध 

तुम्हाला पाणी मराठी निबंध लेखन / Water Essay In Marathi कसे वाटले ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा धन्यवाद,

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Pollution In Marathi

Essay On Pollution In Marathi नमस्कार मित्रांनो ! आज मी तुम्हाला प्रदूषण वर मराठी मध्ये निबंध लिहून देणार आहोत . हा निबंध वेगवेगळ्या शब्दांत लिहिल्या गेलेला आहेत . हा निबंध तुम्ही तुमच्या परीक्षेत नक्कीच वापरू शकता. प्रदूषण म्हणजे काय ? प्रदूषणाचे प्रकार किती आहेत याची माहिती आपण इथे पाहणार आहोत.

Essay On Pollution In Marathi

प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Pollution In Marathi ( १०० शब्दांत )

उपचार न केलेले औद्योगिक कचरा थेट नद्या, टाक्यांमध्ये आणि तलावांमध्ये सोडल्यामुळे जल प्रदूषण होते. हे सर्व प्रकारे टाळले पाहिजे. कचरा थेट नद्यांमध्ये सोडला जाऊ नये. कचर्‍यावर योग्य प्रकारे उपचार केले पाहिजे. किनारपट्टीच्या तेलाच्या विहिरींमधून आणि जहाजे हलविण्याच्या वेळी तेलाच्या गळतीमुळे महासागराचे जल प्रदूषित होते. तेलाची गळती रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना व काळजी घेतली पाहिजे.

प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Pollution In Marathi ( २०० शब्दांत )

गेल्या काही वर्षांत, पाणी अधिकाधिक प्रदूषित होत आहे आणि या समस्येमुळे पर्यावरणासंदर्भात जागरूक असणाऱ्या बर्‍याच लोकांची चिंता वाढत चालली आहे. त्याचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी आपण प्रथम या समस्येच्या कारकांचे विश्लेषण केले पाहिजे.

कॅन, प्लास्टिक पिशव्या आणि अगदी सिगारेटचे बुट्टे दूर फेकणे, कुरणांना प्रदूषित करते, म्हणूनच पावसामुळे या पदार्थांपासून रसायने सोडली जातील आणि ज्यांचे गाळ ओढ्यात सापडतील अशा जमिनीमुळे ते शोषून घेतील. उदाहरणार्थ, इल्वा हा इटलीच्या दक्षिणेकडील भागातील एक प्रसिद्ध कारखाना आहे जो धूरांमुळे सर्व देशातील सर्वात प्रदूषक कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे आणि इमारतीच्या खाली जाणार्‍या पाण्यात ते सोडण्यात आले आहेत.

प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Pollution In Marathi ( ३०० शब्दांत )

प्रदूषण ही एक संज्ञा आहे जी आजकाल मुलांनाही ठाऊक आहे. हे इतके सामान्य झाले आहे की प्रदूषण सतत वाढत आहे हे जवळजवळ प्रत्येकजण कबूल करतो. ‘प्रदूषण’ या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीत कोणत्याही अप्रत्याशित परदेशी पदार्थाचे प्रकटीकरण. जेव्हा आपण पृथ्वीवरील प्रदूषणाबद्दल बोलतो तेव्हा आपण विविध प्रदूषकांद्वारे नैसर्गिक स्त्रोतांना होणार्‍या दूषिततेचा संदर्भ देतो.

प्रदूषणाचे परिणाम :-

प्रदूषणाचा परिणाम एखाद्याच्या कल्पना करण्यापेक्षा जीवनाच्या गुणवत्तेवर होतो. हे रहस्यमय मार्गाने कार्य करते, कधीकधी ते उघड्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकत नाही. तथापि, हे वातावरणात खूप उपस्थित आहे. उदाहरणार्थ, आपण हवेत असलेले नैसर्गिक वायू पाहू शकणार नाही परंतु ते अजूनही तेथे आहेत. त्याचप्रमाणे, वायूला गोंधळात टाकणारे आणि कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढविणारे प्रदूषक मनुष्यांसाठी खूप धोकादायक आहेत. कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढीव पातळीमुळे जागतिक तापमानवाढ होईल.

प्रदूषण कमी कसे करावे?

म्हणूनच लक्षात ठेवा की त्यांचा वापर केल्यावर विल्हेवाट लावू नका, परंतु जोपर्यंत आपण हे करू शकता तोपर्यंत परत वापरा. हानिकारक वायू शोषून घेण्यास आणि हवेला स्वच्छ बनविण्यासाठी अधिकाधिक झाडे लावण्यास आपण सर्वांना प्रोत्साहित केले पाहिजे. मोठ्या स्तरावर बोलत असताना, मातीची सुपीकता राखण्यासाठी सरकारने खतांचा वापर मर्यादित केला पाहिजे. याव्यतिरिक्त, उद्योगांना त्यांचा कचरा महासागर आणि नद्यांमध्ये टाकण्यास बंदी घातली पाहिजे, ज्यामुळे जल प्रदूषण होणार नाही .

प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Pollution In Marathi ( ४०० शब्दांत )

प्रदूषण ही एक गंभीर बाब आहे आणि निसर्ग आणि मानवी शत्रूंपैकी एक आहे. जरी अद्याप खरोखर निराकरण न होणारी ही गंभीर बाब आहे. शुद्ध वस्तूंमध्ये प्रदूषक मिसळणे ज्यामुळे वस्तू हानिकारक किंवा निरुपयोगी प्रदूषण होते. प्रदूषण हे मानवतेसाठी, निसर्गासाठी आणि पृथ्वीवरील इतर प्राण्यांसाठी शाप देण्यासारखे आहे. त्याचा जागेवरही परिणाम झाला आहे.

प्रदूषणाचे प्रकार :-

अस्तित्वावर परिणाम :-.

समाजातील विकास माणसासाठी आवश्यक आहे परंतु प्रदूषण नावाच्या विकासाचा दुष्परिणाम होतो. जरी आम्हाला विकासाची आवश्यकता आहे परंतु वापरकर्त्यांसाठी आपण अपव्ययांची योग्य व्यवस्था केली पाहिजे. आपण त्यांना निसर्गाने उघडे ठेवू नये. ते मानवांवर, प्राण्यांवर आणि निसर्गावरही बरेच परिणाम करतात.

जल प्रदूषण :-

वायू प्रदूषण :-, भूमी प्रदूषण :-, ध्वनी प्रदूषण :-, तात्पर्य :-.

तर मित्रांनो प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Pollution In Marathi हा निबंध तुम्हाला जरूर आवडला असेलच , हा निबंध दुसऱ्यांना share करण्यास अजिबात विसरू नका, धन्यवाद .

हे निबंध सुद्धा जरूर वाचा :-

प्रदूषणाचे प्रकार कोणते .

वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, किरणोत्सर्गी प्रदूषण, मृदाप्रदूषण.

प्रदूषण म्हणजे काय ?

प्रदूषणाचे आरोग्यावर काय परिणाम होतात.

प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, हृदयवरक्तवाहिन्यासंबंधी रोग, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, कर्करोग आणि जन्मदोष होऊ शकतात.

जल प्रदूषण म्हणजे काय जल प्रदूषणाची कारणे स्पष्ट करा?

वायू प्रदूषण म्हणजे काय .

वायू प्रदूषण हे कोणत्याही रासायनिक, भौतिक किंवा जैविक घटकांद्वारे घरातील किंवा बाहेरील वातावरणाचे दूषित आहे जे वातावरणाच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांमध्ये बदल करते .

भूमी प्रदूषण म्हणजे काय ?

पृथ्वीच्या जमिनीच्या पृष्ठभागावर आणि जमिनीच्या पातळीच्या खाली खराब होणे होय. भूजल आणि माती दूषित करणार्‍या घन आणि द्रव कचरा सामग्रीच्या संचयामुळे हे होते.

ध्वनी प्रदूषणाचा काय परिणाम होतो?

1 thought on “प्रदूषण वर मराठी निबंध essay on pollution in marathi”.

water pollution essay in marathi

मराठी विश्वकोश

जल प्रदूषण (Water pollution)

  • Post published: 22/07/2019
  • Post author: जयकुमार मगर
  • Post category: जीवसृष्टी आणि पर्यावरण / पर्यावरण
  • Post comments: 5 Comments

नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जल प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते.

पाण्यातील प्रदूषकांचे स्रोत पुढीलप्रमाणे आहेत :

(१) मानवी मलमूत्र व औदयोगिक कार्बनी अपशिष्ट : मानवी वस्त्यांमधून उत्सर्जित झालेले मलमूत्र आणि औदयोगिक अपशिष्टातील कार्बनी पदार्थ मलवाहिन्यांतून नदी, समुद्र किंवा इतर जलाशयांत टाकले जातात. पाण्यात अतिप्रमाणात कार्बनी पदार्थ असल्यास सूक्ष्मजीवांची ऑक्सिजनाची मागणी वाढते. परंतु पाण्यातील ऑक्सिजनाची उपलब्धता घटते. त्यामुळे पारिस्थितिकीय संतुलन बिघडते व प्रदूषकांची समस्या निर्माण होते. विविध कारखान्यांमधून कार्बनी अपशिष्टे पाण्यात सोडल्यामुळे, या अपशिष्टांमार्फत ऑक्सिजन शोषून घेतला जातो. त्यामुळे जल प्रदूषणाची तीव्रता वाढते.

सांडपाणी व मैला वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये रोगांचे सूक्ष्मजीव असतात. अशा पाण्यावर संस्करण केल्यास काही सूक्ष्मजीवांचा नाश होतो, तर काही जिवंत राहतात. असे पाणी इतर जलाशयांत मिसळल्यास ते पाणी प्रदूषित होते. मैलापाण्याची सोय नीट न लावल्यास, त्यामुळे प्रदूषित झालेल्या पाण्याच्या वापरामुळे जठर आणि आतड्याचे रोग संभवतात.

(२) रासायनिक खते : शेतीपासून अधिक उत्पन्न व्हावे, यासाठी शेतजमिनीत रासायनिक खतांचा उपयोग केला जातो. ही खते जोराचा पाऊस पडल्यास ओहोळ, जलप्रवाह यांतून नद्यांना व परिणामी समुद्राला मिळतात. पाण्यातून वाहून आलेल्या या रासायनिक खतांमुळेही  जल प्रदूषण होते. जमिनीवरील रासायनिक खते द्रवाच्या रूपात पाझरून भूजलसाठ्यात मिसळून भूजल प्रदूषित होते.

काही वेळा रासायनिक खतातील उर्वरित भागाचा उपयोग शैवालांच्या पोषणासाठी होतो. त्यामुळे शैवालांची वाढ जलद व दाट होते. मात्र, इतर वनस्पतींची वाढ खुंटते. तसेच माशांना धोका पोहोचतो. कालांतराने इष्ट प्रमाणात पोषकद्रव्ये न मिळाल्यास शैवालांचा लवकरच नाश होतो. ही मृत शैवाले कुजतात व अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव त्यांवर वाढतात. ते पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतात. या कुजलेल्या शैवालांमुळे पाण्याला दुर्गंधी सुटते.

(३) कार्बनी रसायने : आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशके, कवकनाशके, तणनाशके इ. रसायनांचा वापर केला जातो. त्यामध्ये विषारी द्रव्ये असतात. त्यांचा अल्पांश पिण्याच्या पाण्यात मिसळल्यास जल प्रदूषणाचा धोका निर्माण होतो.

water pollution essay in marathi

(४) खनिज द्रव्ये व रासायनिक अपशिष्टये : कारखान्यातून बाहेर पडलेले अपशिष्ट पदार्थ जलाशयात सोडल्यास त्यातील पाणी प्रदूषित होते. कॅल्शियम व मॅग्नेशियम यांचे क्षार पाण्यात विरघळल्यास ते पाणी कठीण बनते. अशा पाण्याचा उदयोगासाठी व पिण्यासाठी उपयोग होत नाही. औदयोगिक अपशिष्टातील विषारी रसायने पाण्यात मिसळल्यास त्या जलाशयातील जैविक क्रियांमध्ये बदल घडून येतात. काही रसायनांच्या प्रभावाने ते पाणी आम्लीय होते. अशा पाण्यामुळे जलाशयातील सजीवांचा नाश होतो. भारतात चर्म, कागद, लगदा, वस्त्र, रसायने इ. उदयोग जल प्रदूषणास कारणीभूत आहेत.

(५) सांडपाण्यातील व पाणलोटातील गाळ : त्याज्य पाण्यातील गाळामुळे जलाशय गढूळ होतात. गाळाचे थर जमा होऊन कधीकधी जलाशय गाळाने भरून जातात. जलप्रवाहास गाळाचा अडथळा होऊन मैलापाणी व सांडपाणी कोंडले जाऊन चिकट गाळ खाली बसतो. त्यात विनॉक्सिजीवी सूक्ष्मजीव निर्माण होतात. त्यामुळे काही अंशी गाळाचे अपघटन होते. मात्र, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात खर्ची पडतो व हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढते. विनॉक्सिजीवी सूक्ष्मजीवांमुळे हायड्रोजन सल्फाइड हा वायू पाण्यात मिसळतो. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते.

(६) किरणोत्सारी पदार्थ : किरणोत्सारी अपशिष्टांची विल्हेवाट लावण्यासाठी ती जलप्रवाहाच्या मदतीने विरल करून विखुरली जातात. ही अपशिष्टे जलप्रवाह किंवा समुद्रात मिसळल्यास तेथील पाणी प्रदूषित होते.

(७) उष्णता : पाण्याचे निक्षरीकारक संयंत्रे, औष्णिक विद्युत् निर्मिती, रासायनिक व पोलाद कारखाने, अणुकेंद्रीय संयंत्रे अशा अधिक प्रमाणात पाण्याची गरज असणाऱ्या आस्थापनांतून बाहेर पडणारे पाणी अतिउष्ण असते. हे पाणी इतर जलाशयांत सोडल्यास ‘औष्णिक प्रदूषण’ होते. अशा अनैसर्गिक उष्णतेमुळे तेथील पाण्यातील सजीवांच्या जीवनचक्रास बाधा येते व परिसंस्थेचे संतुलन बिघडते.

(८) खनिजे व ज्वालाग्राही तेल : कधीकधी समुद्रपृष्ठावर अपघात घडून येतात. त्यामुळे जलप्रदूषण होते. खनिजे व ज्वालाग्राही तेलाची वाहतूक बहुधा जहाजांतून होत असते. त्यांतील तेलाच्या टाक्या फुटून तेल समुद्रावर पसरते. अशा पाण्यामुळे पक्षी, मासे व इतर जलचर तसेच पाणवनस्पती मृत्युमुखी पडतात. सागरी संसाधनांचा ऱ्हास होतो. समुद्रकिनाऱ्यावरील खनिज तेल परिष्करण कारखान्यांतून, विहिरींतून व साठवण टाकीतून काही प्रमाणात गळत राहते व पाझरत राहते. हे तेलही समुद्राच्या पाण्यात मिसळल्यास जल प्रदूषण होते. अशा दुर्घटनांमुळे माशांना धोका निर्माण होतो. तेल परिष्करण कारखान्याच्या परिसरात जलीय कवचधारी जीवांची निपज होऊ शकत नाही. साठवणीच्या टाक्या स्वच्छ करताना त्यांतील खनिज तेल, पेट्रोल, केरोसीन, डांबर इ. पदार्थ पाण्यात मिसळतात व प्रचंड प्रमाणात मासे मरतात. समुद्रपृष्ठावर तेल पसरल्याने त्या पाण्यात सूर्याची किरणे कमी प्रमाणात मिसळतात. त्यामुळे सागरी जल व वातावरण यांच्यातील ऑक्सिजन विनिमय प्रक्रिया मंद होते.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :

• जलशुद्धीकरण करणे.

• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.

• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.

• पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही, यावर नियंत्रण ठेवणे.

• कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे.

• कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे.

• पिण्याच्या पाण्यातील रसायनांच्या प्रमाणाची विशिष्ट मर्यादा असते. या सहज मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रसायनांची वाढ होऊ नये, यासाठी योग्य ती दक्षता घेणे.

• किरणोत्सारी अपशिष्टे विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवण्याच्या पद्धतीचा अवलंब करणे.

• औष्णिक जल प्रदूषणामूळे जलाशय किंवा समुद्रातील पाण्याचे तापमान २ ० से.पेक्षा अधिक वाढणार नाही, याची खबरदारी घेणे.

• खनिज तेलामुळे होणाऱ्या जल प्रदूषण समस्येवर उपाययोजना आखणे.

महाराष्ट्रात जल प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. नदयांतील पाण्याच्या दर्जाचे संनियंत्रण ४८ ठिकाणी नियमितपणे केले जाते. या ४८ पैकी, ३५ ठिकाणी पाण्याचा दर्जा खालावल्याचे आढळले आहे. महाराष्ट्र राज्याने १९९५ मध्ये राष्ट्रीय नदी कृती आराखडा तयार केला असून नागरी व घरगुती सांडपाण्यामुळे होणारे जल प्रदूषण कमी करणे, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. या योजने अंतर्गत सांडपाणी अडवणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे, नदीघाटाचा विकास करणे, कमी खर्चाचे स्वच्छतागृह बांधणे इ. योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जल प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना सुचविणे व राज्यांच्या सहकार्याने राबविणे यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय जल दर्जा मूल्यांकन प्राधिकरण नियुक्त केले आहे.

Share this:

You might also like, रज्जुमान संघ (phylum chordata).

Read more about the article होमिओपॅथी (Homeopathy)

होमिओपॅथी (Homeopathy)

Read more about the article औषधे (Drugs)

औषधे (Drugs)

Read more about the article ज्वारी (Sorghum)

ज्वारी (Sorghum)

Read more about the article कृमी (Worm)

कृमी (Worm)

This post has 5 comments.

' src=

I like the your own idia

' src=

Water pollution बद्दल माहिती प्रशंसनीय आहे, हि बाब सामान्य जनतेला समजून सुद्धा काही करता येत नाही. त्याकरिता शासनाने सदसद्विवेकबुद्धी ने विचार करून कार्यवाही करणे आवश्यक आहे

' src=

The information is so helpful in preparing my EVs project . Thank you sir

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

  • मराठी विश्वकोश इतिहास
  • पूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक
  • विश्वकोश संरचना
  • मराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे
  • ठळक वार्ता..
  • बिंदूनामावली
  • विश्वकोश प्रथमावृत्ती
  • कुमार विश्वकोश
  • मराठी विश्वकोश परिभाषा कोश
  • मराठी विश्वकोश परिचय-ग्रंथ
  • अकारविल्हे नोंदसूची
  • मराठी विश्वकोश अभिमान गीत
  • विश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना
  • ज्ञानसंस्कृती
  • मराठी परिभाषा कोश
  • मराठी शुद्धलेखनाचे नियम
  • मराठी भाषा विभाग
  • भाषा संचालनालय
  • साहित्य संस्कृती मंडळ
  • राज्य मराठी विकास संस्था

जल प्रदूषणाची संपूर्ण माहिती Water Pollution Information In Marathi

water pollution information in Marathi पाणी (जल) म्हणजे जीवन होय. आपल्या सूर्य मालिकेत पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. कारण पृथ्वीवर जल आहे. पण मानवाने विज्ञानाच्या साह्याने खूप प्रगती केली आहे. पृथ्वी शिवाय अजून इतरही ग्रहांवर सजीवसृष्टी असेल का याचा शोध घेण्यासाठी पृथ्वीवरील बऱ्याच देशांनी इतर ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व शोधण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा पार पडल्या. अगदी सूर्यमालिकेतील मंगळ, गुरू, शनी, बुध, शुक्र यासारख्या सर्व ग्रह हां पर्यंत तसेच चंद्र व टायटन सारख्या उपग्रहांवर देखील मोहिमा आखल्या आहेत. यावरून आपल्याला असे दिसून येते की जल हे सजीवांसाठी किती महत्त्वाचे आहे.

जल प्रदूषणावर माहिती (water pollution information in Marathi)

नमस्कार मित्रांनो , तर आपण आज जल प्रदूषण या विषयावर माहिती पाहणार आहोत. या सदरामध्ये आपण जल प्रदूषण म्हणजे, काय त्यामागील कारणे कोणती, त्याचे काय परिणाम होतात व जल प्रदूषण रोखण्याचे कोण कोणते उपाय आहेत, यावर भाष्य करणार आहोत.(jal pradushan mahiti marathi)

वायू प्रदूषणाची माहिती 

जल प्रदूषण म्हणजे काय? (What is water pollution in Marathi ?)

शुद्ध पाण्यामध्ये जेव्हा अशुद्ध घटक हे नैसर्गिक किंवा नैसर्गिक रित्या मिसळले गेले जातात ज्यामुळे ते सजीवांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते तेव्हा याला जल प्रदूषण असे म्हणतात. असे जल प्रदूषण होण्यासाठी  वैयक्तिक स्तरापासून ते जागतिक स्तरापर्यंत बरेच घटक कारणीभूत असतात. जेव्हा पाण्यामध्ये झाडांचा पालापाचोळा ,माती ,कचरा यांसारखी स्थायू स्वरूपातील घटक आणि कारखान्यातून निघणारे रसायने, सांडजल यासारखी द्रव स्वरूपातील घटक मिसळल्याने जितके जल प्रदूषण होते तितकेच पाण्याचे तापमान वाढल्याने ही होते. म्हणजेच पाण्याचे वाढते तापमान हे जल प्रदूषणास कारणीभूत असते.

जल प्रदूषण विचारात घेताना पृथ्वीच्या पृष्ठावरील जल म्हणजेच पृष्ठीय जल आणि भूजल म्हणजेच पृथ्वीच्या पोटातील जल या दोन प्रकारांचा विचार केला जातो. पृष्ठभागावरचे जल म्हणजे तळे, नदी, समुद्र, महासागर यामध्ये झालेल्या प्रदूषणाचा विचार केला जातो. तसेच जल प्रदूषणासाठी अशुद्ध घटक पाण्यामध्ये मिसळण्यासाठी एक ठराविक केंद्रबिंदू असतो आणि काही वेळेस ठराविक केंद्रबिंदू नसतोही.

जल प्रदूषणाची कारणे! (Causes of water pollution!)

  • जल प्रदूषणासाठी मानवनिर्मित वा अनैसर्गिक तसेच नैसर्गिक घटक कारणीभूत असतात. या बरोबरच रासायनिक ,भौतिक आणि रोगकारक घटक तसेच सेंद्रिय आणि असेंद्रिय घटकही जल प्रदूषणास जबाबदार असतात. वीज प्रकल्पामध्ये पाण्याचा वापर मोठमोठ्या कूलिंग टॉवर्समध्ये शितलक म्हणून केला जातो. अशामुळे पाण्याचे तापमान सामान्य तापमानापेक्षा वाढते.
  • ज्वालामुखी ,वादळ, भूकंप , शेवाळाची पैदास या कारणाने मुळे ही पाण्याच्या गुणवत्तेत आणि पर्यावरणीय संरचनेत खूप मोठ्या प्रमाणात बदल घडतात. जल प्रदूषणामध्ये पृष्ठ भागावरील जल प्रदूषण ,सागरी जल प्रदूषण, भूजलाचे जल प्रदूषण इत्यादी प्रदूषणाची कारणे पाहूयात. घराघरातून निघणारे सांडजल, कारखान्यातून निघणारे रासायनिक द्रव्य इत्यादी घटक हे सरळ नदी-नाले, तलाव यांमध्ये सोडले जातात. त्यामुळे भूपृष्ठीय जल प्रदूषण होते.
  • कारखान्यांमधून निघणारे रासायनिक द्रव्ये तसेच प्लास्टिक कचरा हा नद्यांमधून सरळ समुद्रामध्ये महासागरांत पर्यंत पोचतो आणि अशावेळी सागरी जल प्रदूषण होते. जगातील 90 टक्के निरुपयोगी प्लास्टिक हे नद्या मार्फत  महासागरापर्यंत पोहोचते. अशा साखरी प्रदूषणासाठी चीन, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, व्हिएतनाम ,श्रीलंका ,थायलंड ,मलेशिया आणि नायजेरिया हे देश मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.
  • त्यानंतर सांड जल ,खाते आणि कीटकनाशक इ घटक पाण्यामध्ये मिसळल्यामुळे ते जल जेव्हा जमिनीमध्ये झिरपते तसेच घरगुती आणि कारखान्यातील अनावश्यक जल जेव्हा जमिनीमधून झिरपून भूजला पर्यंत पोहोचते तेव्हा भूजल प्रदूषण होते.
  • कारखान्यातून निघणारे पाईप गळती तसेच शहरातील लोकांना जल पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या मोठ्या मोठ्या मधून होणारी गळती तसेच सांडजल  निचरा करण्याची जागा अशासारखे ठिकाणा मधून आपल्याला निश्चित जल प्रदूषण होण्याची स्त्रोत सापडतात. आणि त्याबरोबरच
  • निश्चित स्त्रोत सापडत नाहीत,उदाहरणार्थ शेतामध्ये वापरली जाणारी खते , नायट्रोजन  हे मोठ्या प्रमाणात जलसिंचन मुळे पाण्यामध्ये मिसळले जाते. शहरी भागात ज्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या जातात तसेच रस्ते महामार्ग आणि शहरी वस्त्या या ठिकाणीसुद्धा प्रदूषित किंवा दूषित जल हे नाल्यांमध्ये वाहून नेले जाते.

जल प्रदूषणाचे परिणाम! (Consequences of water pollution!)

  • पाण्याच्या वाढलेल्या तापमानामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, पाण्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात सागरी जीवांचा मृत्यू होतो, मासे मरतात. त्यामुळे अन्नसाखळी कोलमडते आणि जैवविविधता धोक्यात येते.
  • प्रदूषित पाण्यातील प्लास्टिक हे विशारी रसायनी शोषून घेते. आणि अशा मुळे अशी प्लॅस्टिकचे जेव्हा माशांच्या तोंडात जाते तेव्हा सागरी जलचरांवर पुन्हा एकदा त्याचा विपरीत परिणाम होतो.
  • याबरोबरच दूषित पाण्यामुळे मानवी आरोग्यास सुद्धा धोका निर्माण होतो. दूषित पाण्यामुळे निरनिराळे साथीचे रोग पसरतात. कॉलरा , हगवण यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. मानवी शरीरात 70 टक्के जल असते त्यामुळे जल शुद्धीकरण करून ग्रहण करणे हे मानवासाठी सोयीचे असते.
  • 2015 मध्ये 1.8 दशलक्ष जल प्रदूषणामुळे मानवी मृत्यू झाले आहेत. भारत आणि चीन हे देश जल प्रदूषणासाठी उच्च स्थानावर आहेत. चीनमधील  90 टक्के प्रदूषित जल हे शहरी भागातील आहे.
  • प्रदूषित जल मापन ही ठराविक पद्धतीने केले जाते. त्यामध्ये भौतिक रासायनिक आणि जैविक घटकांचा विचार केला जातो. अशावेळी दूषित पाण्याचा नमुना घेऊन तो सरकारी एजन्सी आणि संशोधन संघटनेकडे तपासणीसाठी दिला जातो. त्या नमुन्यामध्ये पाण्याचे तापमान आणि स्थायु स्वरूपातील अशुद्धता यासारख्या भोवती घटकांचा तसेच पीएच ,जैवरासायनिक ऑक्सिजनची आवश्यकता,  रासायनिक ऑक्सिजनची आवश्यकता, तेल आणि ग्रीस यांसारख्या रासायनिक घटकांचा विचार केला जातो. याबरोबरच पाण्यातील जैविक परिस्थितीकी सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी प्राणी आणि सूक्ष्मजीविय निर्देशकांचा तसेच वनस्पतींचा वापर केला जातो.

जल प्रदूषण रोखण्यासाठी उपाय! (Measures to prevent water pollution!)

  • जल प्रदूषण रोखण्यासाठी सरकार आपल्या पातळीवर विविध योजना राबवत असते. पण वैयक्तिक पातळीवर आपली ही जबाबदारी आहे.
  • व्यवस्थित सांडपाण्याचा निचरा करणे. गळणारी पाईप लाईन्स हे दुरुस्त करून करून त्या जागी नवीन पाईपलाईन बसवणे त्यामुळे पाण्याची गळती कमी होईल.
  • कारखान्यातून निघणाऱ्या प्रदूषित पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटक आणि  विषारी प्रदूषके असल्यामुळे अशा पाण्याचा सुरक्षितपणे निचरा करणे.
  • पाळण्याची तापमान संतुलित ठेवणे म्हणजेच पाण्यातून अनावश्यक उष्णता बाहेर काढून टाकणं. त्याबरोबरच काही वनस्पतींमध्ये पाण्यातील अनावश्यक घटक आणि रोगकारक घटक बाहेर काढून टाकण्याची नैसर्गिक क्षमता असते, अशा वनस्पतींची वाढ करणे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि जल प्रदूषण कशामुळे व का होते ? व त्याचे दुष्परिणाम  काय आहेत त्याच बरोबर ते रोखण्याचे उपाय देखील आपण या लेखात पाहिले आहेत. water pollution information in Marathi language pdf हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच water pollution in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही जल प्रदूषणाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या jal pradushan mahiti marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

  • Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • सामान्य ज्ञान

Author

  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • सपकाळ नॉलेज हब संस्थेच्या हबमधील 4500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य वाचणार
  • सरकारच शिक्षण धोरण घातक ..
  • तयारी करा देशातील ४५ बँकामधील महाभारती प्रक्रिया होणार सुरु या आहेत तारखा
  • राज्याचे शिक्षणमंत्री बोगस म्हणून शिक्षणाचे वाटोळे झाले.. मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
  • 'बागी'बद्दल टायगर श्रॉफ म्हणाला...

प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)

कु.ऋचा दीपक कर्पे.

water pollution essay in marathi

  • वेबदुनिया वर वाचा :
  • मराठी बातम्या

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

अधिक व्हिडिओ पहा

water pollution essay in marathi

तुमच्या नाभीत घाण कशी आणि कुठून तयार होते, माहित आहे का?

तुमच्या नाभीत घाण कशी आणि कुठून तयार होते, माहित आहे का?

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील, तुमचे शरीर राहील तरुण

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील, तुमचे शरीर राहील तरुण

Tandoori Roti Recipe : या पद्धतीने बनवा फुगलेली तंदुरी रोटी

Tandoori Roti Recipe : या पद्धतीने बनवा फुगलेली तंदुरी रोटी

घरात मुंग्याचा त्रास असल्यास हे 3 घरगुती उपाय करा

घरात मुंग्याचा त्रास असल्यास हे  3 घरगुती उपाय करा

कंबरदुखीने हैराण असल्यास अंघोळीच्या पद्धतीत करा हे बदल, जाणून घ्या 5 टिप्स

कंबरदुखीने हैराण असल्यास अंघोळीच्या पद्धतीत करा हे बदल, जाणून घ्या 5 टिप्स

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

water pollution essay in marathi

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

पाणी अडवा पाणी जिरवा माहिती व निबंध | Save Water information & Essay in Marathi

पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी बचत उपाय  आणि  पाण्याचे महत्त्व निबंध/ भाषण (save water information in Marathi )

Save water essay in marathi:  पाणी है निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली अनमोल भेट आहे, आणि याचे मूल्य लावणे कठीण आहे. पाण्याशिवाय जीवनाचे महत्त्व नाही, आणि अस्तित्व ही नाही मग ते  जीवन  प्राण्यांचे असो वा मनुष्याचे. 

प रंतु आजच्या आधुनिक युगात माणसाच्या निष्काळजीपणामुळे  धरतीवर पाण्याची कमी सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्याचा परिणामस्वरूप आज खूप सारे ठिकाण पाण्याच्या आभावाने कोरडे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणी लोक स्वच्छ पाण्यासाठी तळमळ करीत आहेत. 

water pollution essay in marathi

पाणी वाचवण्याची आवश्यकता pani vachava in marathi

मनुष्य हा अन्ना शिवाय 3 आठवडे जगू शकतो पण पाण्या शिवाय 2-3 दिवसच जिवंत राहू शकतो. पृथ्वीच्या अर्ध्या पेक्षा जास्त भागावर पाणी आहे, परंतु यातील अधिक पाणी के खारे आहे म्हणूनच पिण्यायोग्य पाण्याची फारच टंचाई आहे. मनुष्य आपले नियमित कार्य जसे अंघोळ करणे, कपडे वैगरे धुणे, अन्न शिजवणे इत्यादी कार्यांमध्ये सर्वात जास्त पाणी वाया घालवतो. एका अनुमानानुसर 2025 पर्यंत पाण्याच्या कमी मुळे जवळपास 3 अरब लोक पीडित असतील. म्हणून जर आपण आज पासूनच पाणी वाचवण्यासाठी उपाय करू तर भविष्यात या समस्यावर मात करता येईल.

जल संरक्षणाचा अर्थ-

जल संरक्षणाचा साधारण अर्थ आहे की कोणत्याही पद्धतीने पाणी वाचवणे. तुम्ही स्वतःच विचार करा आज पृथ्वीवर फक्त 3% पाणी पिण्यायोग्य आहे आणि या पेक्षा चिंताजनक गोष्ट कोणतीच राहू शकत नाही. विशेषज्ञच्या अनुसार जर जल संरक्षणाचे उपाय नाही केले गेले, व अश्याच पद्धतीने पाण्याची बरबादी सुरू राहिली तर तीसरे महायुद्ध पाण्यावर अधिकार मिळवण्यासाठी होईल, आणि यात मानव जातीचा विनाश निश्चित आहे.

प्लास्टिक मुक्त भारत वाचा येथे..   

जल संरक्षणाचे उपाय/ पाणी बचत उपाय -

जर भविष्यात होणाऱ्या जल संकटांपासून वाचायचे असेल तर सर्वप्रथम सर्व लोकामध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल. आज मानवाने आपल्या चुकांमुळे निसर्गाला खूप क्षति पोहचवली आहे, म्हणून जर येणाऱ्या पिढ्यांचे अस्तित्व वाचवायचे असेल तर पुढील उपाय करणे आवश्यक आहे.

1) शौच तसेच धुणी भांडी साठी खारे तसेच पावसाचे पाणी सुद्धा वापरता येऊ शकते.

2) झाडांना पाणी देण्यासाठी नळी ऐवजी बादली व मग वापरा.

3) जर घरात नळ वैगरे टपकत असेल तर त्याला लवकरात लवकर  दुरुस्त करा कारण टपकणार्या नळातून खूप सारे पाणी वाया चालले जाते.

4) पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याला जमा करण्यासाठी छतावर टाकी व इतर पाणी भरण्याची भांडी ठेवा.

5) रोजचे काम जसे भांडे धुणे, कपडे धुणे, जेवण बनवणे इत्यादी कामात कमीत कमी पाणी वापरण्याचा प्रयत्न करा.

6)अंघोळीला शॉवर ऐवजी बादली मधील पाणी वापरा.

७) घराच्या अंगणाला परत परत पाण्याने धुण्याऐवजी झाडू चा वापर करा.

पाणी वाचवा घोषवाक्य मराठी (save water slogans in marathi)

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध- p ani adva pani jirva marathi nibandh (save water essay in marathi).

आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की, पाणी हेच जीवन आहे. पाण्याचा एक एक थेंब अमृताप्रमाने आहे. परंतु आज मोठ्या प्रमाणात पाणी नष्ट केले जात आहे, ज्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. जर पाण्याचा हा अपव्यय अशाच पद्धतीने सुरू राहिला तर येणाऱ्या काळात, पुढील पिढीला शुद्ध पाण्याच्या एक एक थेंबाकरीता तळमळ करावी लागेल. 

पाण्याचा अभावाने भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला शक्य होईल तेवढ्या लवकर पाण्याचा अपव्यय थांबवावा लागेल. आज आपल्या देशात अनेक ठिकाणी बुच नसलेले नळ आहेत. या नळांमधून नेहमी पाणी वाहत राहते. काही ठिकाणी गरज नसतांना स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. आज पृथ्वीवरील जवळपास 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. परंतु यातील फक्त थोडेच पाणी पिण्यायोग्य आहे. उरलेले सर्व पाणी समुद्राचे खारट आणि दूषित पाणी आहे.

पाण्याचे दुष्काळाने व दूषित पाणी प्यायल्याने दरवर्षी जगभरात जवळपास 40 लाख लोक मृत्यू मुखी पडतात. स्वच्छता नसलेल्या दूषित पाण्याला प्यायल्याने अनेक रोग पसरत असतात. भारतासारख्या विकसनशील देशात या रोगांचे प्रमाण खूप जास्त आहे. पाण्याने होणाऱ्या रोगांमुळे जगभरात दर 15 सेकंदात एका बालकाचा मृत्यू होतो. शुद्ध पाणी मिळावे म्हणून दरवर्षी जगभरातील शासन व नगरिकांद्वारे 80 अरब डॉलर खर्च केले जातात. 

जीवनशैलीत फार जास्त बदल न करता आपण पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. दररोज एका घरातील प्रत्येक सदस्य दिवसातून सरासरी 260 लिटर पाणी वापरतो. प्रत्येक व्यक्तीने आपली जवाबदारी समजायला हवी. अन्न धुणे तसेच शिजवणे या कामांमध्ये जास्त पाणी वापरू नये. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी शौचालय, कपडे धुणे, झाडांना देणे इत्यादी कामांसाठी वापरावे. पावसाचे पाणी आपण एकत्रित करून वापरायला हवे. 

अंघोळ करताना शॉवर वापरण्याऐवजी बादली मधील पाण्याने अंघोळ करावी. होळी सारख्या सणांच्या वेळी जास्त पाणी सांडू नये. काम झाल्यावर लगेच नळ बंद करावा. जर घरातील पाण्याचे नळ खराब असेल व त्यातून थोडे थोडे पाणी गळत असेल तर त्याला लवकर बदलून अथवा दुरुस्त करून घ्यावे, कारण थोडे थोडे पाणी वाया जाऊन देखील दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.

पृथ्वीवर जीवनाचा सर्वात आवश्यक स्त्रोत पाणी आहे. जल हेच जीवन आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्यात पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून आपण नष्ट होणारे पाणी रोखायला हवे. व जास्तीत जास्त पाणी अडवायला हवे आणि जास्तीत जास्त पाणी जिरवायला हवे.

वाचा>   जल प्रदूषण मराठी माहिती

तर मित्रहो या लेखात पाणी आडवा पाणी जिरवा या विषयावरील मराठी निबंधव प्रकल्पाची माहिती प्राप्त केली. आशा आहे आपणास ही pani adva pani jirva nibandh व माहिती उपयोगाची ठरली असेल हा निबंध आपले मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

water pollution essay in marathi

जल प्रदूषण मराठी घोषवाक्ये, Water Pollution Slogans in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जल प्रदूषण मराठी घोषवाक्ये (water pollution slogans in Marathi). जल प्रदूषण मराठी घोषवाक्ये हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी जल प्रदूषण मराठी घोषवाक्ये (water pollution slogans in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये घोषवाक्ये उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

प्रत्येक सजीवाला त्यांचे जीवन टिकवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. हा ग्रहावरील आवश्यक घटकांपैकी एक आहे.

जलप्रदूषण म्हणजे जलसाठ्यांचे होणारे नुकसान जे सहसा मानवी क्रियाकलापांमुळे होते. सरोवरे, महासागर, नद्या इत्यादी जलस्रोतांमध्ये विषारी पदार्थ प्रवेश केल्यावर जलप्रदूषण होते. हे असे पाणी शुद्ध पाण्यात मिसळते ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता खराब होते. मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरवर्षी, प्रदूषित पाण्यामुळे युद्ध आणि इतर प्रकारच्या हिंसाचारापेक्षा जास्त लोक मारले जातात.

प्रदूषक भूगर्भातील पाण्यामध्ये झिरपतात आणि पोहोचतात जे आपण आपल्या घरातील दूषित पाणी म्हणून आपल्या दैनंदिन कामात पिण्याच्या पाण्यासह वापरतो. दूषित पाण्यापासून आजार होण्याचे प्राथमिक कारण म्हणजे जलजन्य रोगजनक, मानवी आणि प्राणी या दोन्ही कचऱ्यापासून रोग निर्माण करणारे जीवाणू आणि विषाणूंच्या रूपात असतात.

जलप्रदूषणाची कारणे

पाणी हे इतर कोणत्याही द्रवाच्या तुलनेत जास्त पदार्थ विरघळू शकते. हे पाणी सहज प्रदूषित होण्याचे कारण आहे. कचऱ्याच्या तुकड्यांपासून ते अदृश्य रसायनांपर्यंत जलप्रदूषणाचे स्रोत म्हणून काम करतात.

प्रत्येक निरोगी परिसंस्थेमध्ये प्राणी, वनस्पती, जीवाणू आणि बुरशी यांचे एक जाळे असते. यापैकी कोणत्याही जीवाला हानी पोहोचवण्याचा साखळी प्रभाव असतो, ज्यामुळे संपूर्ण परिसंस्था विस्कळीत होते. जलप्रदूषण विविध प्रकारचे असते – सेंद्रिय, अजैविक आणि किरणोत्सर्गी इत्यादी.

जल प्रदूषण मराठी घोषवाक्ये

दूषित पाण्यात माणसाला फक्त आजारीच नाही तर लोकांचा जीव घेण्याची क्षमता असते. दरवर्षी सुमारे १ अब्ज लोक असुरक्षित पाण्यामुळे आजारी पडतात. गरीब लोकांना अशा प्रदूषणाचा जास्त धोका असतो कारण त्यांची घरे बहुतेक प्रदूषित उद्योगांच्या जवळ असतात. जलप्रदूषण ही जागतिक समस्या आहे.

घोषवाक्ये हि अशी आहेत ज्यांचा प्रेक्षकांवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. आज जगाला भेडसावत असलेल्या धोक्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आम्ही येथे जल प्रदूषण वर लक्ष वेधून घेणार्‍या घोषणा देत आहोत.

या घोषणांचा हेतू केवळ जागरूकता वाढवण्याचा नाही तर प्रदूषण नियंत्रित आणि मर्यादित करण्यासाठी लोकांना त्यांचे कार्य करण्यास प्रेरित करतात. या घोषणा तुम्हाला स्वच्छ आणि आनंदी समाजासाठी योगदान देण्यासाठी प्रेरित करतील.

जलप्रदूषण हे पृथ्वीवरील सातत्याने वाढणाऱ्या समस्येत रूपांतरित झाले आहे जे मानव आणि प्राणी जीवनावर सर्व दृष्टिकोनातून प्रभाव टाकत आहे. मानवी व्यायामामुळे निर्माण होणाऱ्या हानिकारक विषारी द्रव्यांमुळे पाणी दूषित होऊन पिण्याचे पाणी दूषित होत आहे. संपूर्ण पाणी असंख्य स्त्रोतांद्वारे घाण होत आहे, उदाहरणार्थ, शहरी गळती, ग्रामीण, यांत्रिक, गाळ, आणि इतर मानवी व्यायाम.

तर हा होता वन्यजीव मराठी घोषवाक्ये माहिती लेख. मला आशा आहे की आपणास वन्यजीव मराठी घोषवाक्ये हा मराठी माहिती निबंध लेख (water pollution slogans in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

3 thoughts on “जल प्रदूषण मराठी घोषवाक्ये, Water Pollution Slogans in Marathi”

शायरी पाहिजे

आम्हाला घोषवाक्य पाहिजे

Leave a Comment Cancel reply

logo

वायू प्रदूषण मराठी माहिती – उपाय, परिणाम, कारणे, PDF

Shubham

Table of Contents

वायू प्रदूषण मराठी माहिती Air Pollution Information in Marathi

  • डिजिटल स्वाक्षरी माहिती
  • डिजिटल बँकिंग बद्दल माहिती
  • दुर्गा स्तोत्र मराठी
  • महालक्ष्मी स्तोत्र मराठी
  • गर्भवती आहार चार्ट मराठी
  • वजन वाढवण्यासाठी आहार तक्ता

वायू प्रदूषणाचे मानवावर होणारे परिणाम  Effects of Air Pollution on Human Health

वायू प्रदूषणाची कारणे causes of air pollution.

  • रामरक्षा स्तोत्र मराठी
  • गणपती स्तोत्र मराठी
  • कलौंजी मराठी माहिती
  • कबड्डी ची माहितीे

वायू प्रदूषण कमी करण्याचे उपाय  How to Reduce Air Pollution

  • सरकारने अशी धोरणे बनवावीत की कर्मचारी घरून काम करतील. आठवड्यातून फक्त एक दिवस ऑफिसला जा. आणि आता माहिती तंत्रज्ञानाच्या आगमनाने हे देखील शक्य झाले आहे. उदाहरणार्थ, यूएस कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे 35% लोक आठवड्यातून फक्त एक दिवस कार्यालयात जातात. बाकीची कामे घरी बसून करा. त्यामुळे त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्चही होत नाही आणि वायू प्रदूषणही वाढत नाही. ये-जा करताना लागणारा वेळ हे लोक इतर कामांसाठी वापरतात.
  • अधिकाधिक सायकल वापरा.
  • सार्वजनिक वाहतूक वापरा.
  • मुलांना गाडीने शाळेत सोडू नका, तर त्यांना शाळेच्या वाहतुकीत जाण्यासाठी प्रोत्साहित करा.
  • तुमच्या घरातील लोकांना कारपूल तयार करण्यास सांगा जेणेकरून ते त्याच कारने ऑफिसला जाऊ शकतील. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणही कमी होईल.
  • तुमच्या घराभोवती झाडे आणि रोपांची योग्य काळजी घ्या
  • गरज नसताना वीज वापरू नका.
  • ज्या खोलीत कूलर फॅन किंवा एअर कंडिशन आवश्यक असेल ती खोली चालवा, बाकीची जागा बंद ठेवा.
  • तुमच्या बागेत कोरडी पाने असल्यास, त्यांना जाळू नका, परंतु त्यातून खत तयार करा.
  • दर तीन महिन्यांनी तुमच्या कारचे प्रदूषण तपासा.
  • फक्त शिसे मुक्त पेट्रोल वापरा. बाहेरच्या तुलनेत घरांमध्ये प्रदूषणाचा प्रभाव कमी असतो, त्यामुळे जेव्हा प्रदूषण जास्त असेल तेव्हा घराच्या आत जा.
Homepage

कबड्डी ची माहितीे

कबड्डी ची माहितीे Kabaddi Information in Marathi

Precautions After COVID-19 Vaccine in Marathi

लस घेतल्या नंतर काय खबरदारी घ्यावी Precautions After COVID19 Vaccine in Marathi

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

E RUPI बद्दल माहिती

E RUPI म्हणजे काय? । E RUPI बद्दल माहिती E RUPI in Marathi

महालक्ष्मी स्तोत्र मराठी

श्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी Mahalaxmi Stotra in Marathi

मिसळ पाव Misal Pav Recipe In Marathi

मिसळ पाव । Misal Pav Recipe in Marathi

मिसळ पाव Misal Pav Recipe In Marathi

रक्षाबंधन शुभेच्छा 2023 Raksha Bandhan Wishes in Marathi

Father's day wishes in Marathi

फादर्स डे शुभेच्छा 2024 Fathers Day Wishes in Marathi

  • Health Tips
  • Recipe in Marathi

Latest Posts

गणपती स्तोत्र मराठी ganpati stotra in marathi.

  • Water Pollution Essay In Marathi
  • Water Pollution

Water Pollution Essay In Marathi

Related Essay Topics

  • Water Pollution Essay
  • Water And Air Pollution Essay
  • Water Pollution Essay In Hindi
  • Effect Of Water Pollution Essay
  • Prevention Of Water Pollution Essay
  • Water Pollution Essay In Urdu
  • Essay Water Pollution 2
  • Water Pollution Conclusion Essays
  • Water Pollution Hindi Essay
  • Air And Water Pollution Essay
  • Essay About Water Pollution In Hindi
  • Short Essay On Water Pollution In Hindi
  • Air Pollution And Water Pollution Essay
  • Cause And Effect Of Water Pollution Essay
  • Essay On Water Pollution
  • How To Prevent Water Pollution Essay
  • Water Pollution Essay In Kannada
  • Water Pollution Essay Pdf
  • Water Pollution Simple Essay
  • Short Essay On Water Pollution
  • Water Pollution Essay In English
  • Water Pollution Essays
  • Ways To Prevent Water Pollution Essay
  • Water Pollution Essay For Students

1

DigitalMarathiWishes

  • श्रावण सोमवार
  • Raksha Bandhan Wishes
  • Janmashtami Wishes
  • Teacher's Day Quotes

प्लास्टिक प्रदूषणावर निबंध - ESSAY ON PLASTIC POLLUTION IN MARATHI

प्लास्टिक प्रदूषणावर निबंध - ESSAY ON PLASTIC POLLUTION IN MARATHI

प्लॅस्टिक प्रदूषणावरील मराठी निबंध | essay on plastic pollution in marathi |  .

प्लास्टिक प्रदूषणावर निबंध - ESSAY ON PLASTIC POLLUTION IN MARATHI

या लेखात आम्ही इयत्ता दहावी ते बारावी, आयएएस, आयपीएस, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण प्लॅस्टिक प्रदूषणावरील मराठी निबंध लिहिले आहे आणि हेनिबंधअतिशय सोपे आणि सरळ भाषेत आहे. हे निबंध वेगवेगळ्या प्रकारे लिहिले आहे.मित्रांनो आज आपण प्लास्टिक प्रदूषणावर मराठी निबंध या लेखाद्वारे २ निबंध बघणार आहोत

तुम्हाला हव्या त्या निबंधाचा सराव करू शकता आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. या निबंधामध्ये  “प्लास्टिक प्रदूषणावर निबंध - निबंध | ESSAY ON PLASTIC POLLUTION IN MARATHI” यावर सविस्तर निबंध मिळेल.चला तर मग बघूया प्लास्टिक प्रदूषणावर मराठी निबंध.

आपल्या आजूबाजूला प्रदूषणाचे एक प्रमुख स्त्रोत आहे हे प्रदूषण म्हणजे प्लास्टिक प्रदूषण आहे! प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम , एक अतिशय महत्वाचा विषय आहे. प्लास्टिक गेल्या दशकापासून आपल्या जीवनावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम करत आहे. अशा काही घटना घडल्या आहेत ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आणि आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकच्या वापराबद्दल खूप हलचल निर्माण केली.

जगातील लोकसंख्या वाढत असताना अनेक  सरकारांनी प्लास्टिक च्या वापरावर बंदी घातली असली, तरी 50 पेक्षा जास्त वर्षांपासून, प्लास्टिक उत्पादन आणि वापर दोन्ही जागतिक पातळीवर वाढत आहेत; कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. आपल्या दैनंदिन जीवनातही, आपण डिस्पोजेबल उत्पादने जसे की पाण्याच्या बाटल्या आणि सोडा कँन वापरतो; अशा उत्पादनांच्या निर्मितीमुळे संपूर्ण पृथ्वीवर प्लास्टिक प्रदूषण वाढले आहे. प्लास्टिक हे गंभीर विषारी प्रदूषकांनी बनलेले आहे आणि ते आपल्या पर्यावरणाला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते, जसे की पाणी, वायू आणि जमीन प्रदूषण. 

प्लॅस्टिक हे कृत्रिम पॉलिमरचे बनलेले असतात, ज्यात अनेक सेंद्रिय तसेच अजैविक संयुगे असतात आणि ते सामान्यतः ओलेफिनसारख्या पेट्रोकेमिकल्समधून मिळतात. प्लास्टिक सामग्रीचे प्रामुख्याने थर्माप्लास्टिक (पॉलिव्हिनिल क्लोराईड आणि पॉलिस्टीरिन) थर्मोसेटिंग पॉलिमर (पॉलीस्टीरिन) म्हणून वर्गीकरण केले जाते. या व्यतिरिक्त, ते अभियांत्रिकी, बायोडिग्रेडेबल आणि इलस्टोमेरिक प्लास्टिकमध्ये देखील वर्गीकृत केले जाऊ शकतात. जरी प्लास्टिक अनेक प्रकारे बऱ्यापैकी उपयुक्त आहे आणि मोठ्या प्रमाणात पॉलिमर उद्योगाचा एक अविभाज्य भाग आहे, परंतु प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीवांना मोठा धोका निर्माण करत आहे.

प्लास्टिक नेमके कसे विघटित होते हे माहीत नाही; जरी असे मानले जाते की यासाठी शेकडो आणि हजारो वर्षे लागतात ,तर फोटो-विघटनानंतर उत्सर्जित झालेले विष आणि तुकडे आमच्या पाण्याच्या वाहिन्या आणि मातीची गुणवत्ता दोन्ही गंभीरपणे प्रदूषित करतात.

प्लास्टिक निसर्गात बायोडिग्रेडेबल नसल्यामुळे त्याचे बारीक कणांमध्ये विघटन करणे शक्य नाही. प्लॅस्टिक जाळणे खूप विषारी असू शकते, अगदी प्राणघातक वातावरणामुळे, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. सर्वात वाईट म्हणजे जर प्लास्टिक लँडफिलमध्ये फेकले गेले तर ते त्या विशिष्ट क्षेत्रात विषारी पदार्थ सोडत राहील. उदाहरणार्थ, समुद्राच्या वातावरणात, प्लास्टिकचे तुकडे जीवांना फिल्टर करून खाल्ले जातात. जेव्हा लहान प्लँकटन प्लास्टिक घेते, अन्न साखळीतील प्राणी खरोखर मोठ्या प्रमाणात साठवू शकतात. 

सोप्या भाषेत सांगायचे तर प्लास्टिक, महासागर, नद्या, तलाव आणि कालवे यांसारख्या जलाशयांमध्ये साठून आपल्या पर्यावरणावर अनेक प्रकारे कसा परिणाम करत आहे हे आपण सतत पाहत असतो. तसेच, आपण त्यांना रस्त्याच्या कडेला डंपिंग करताना पाहू शकतो, जेव्हा ते खरोखरच गलिच्छ दिसते.. हे नंतर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवर नकारात्मक परिणाम करते आणि आपल्या वन्यजीवांना, वनस्पतींना आणि अगदी मानवांनाही खूप नुकसान करते. प्लास्टिक निःसंशयपणे एक अतिशय उपयुक्त सामग्री आहे, परंतु आपण हे विसरू नये की हे विषारी संयुगे बनलेले आहे जे निसर्गात बायोडिग्रेडेबल नसतात आणि आपल्या वातावरणात रोग पसरवतात ज्यामुळे सजीवांना अपरिवर्तनीय नुकसान होते.हजारो वर्षांपासून पाण्यात अस्तित्वात असणाऱ्या प्लास्टिकच्या स्वरूपात फ्लोटिंग कचरा आक्रमक प्रजातींसाठी वाहतूक म्हणून काम करते, जे अधिवासांच्या विकासास अडथळा आणते;

प्लास्टिक मधून बाहेर पडणारी  विषारी रसायने (जसे की बिस्फेनॉल ए, बिस्फेनॉल ए, इ) पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता (स्टायरिन ट्रायमर) हे पदार्थ पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतात ज्यामुळे ते पिण्यास अयोग्य बनते आणि जेव्हा ते सेवन केले जाते तेव्हा जीवघेणा सिद्ध होते.

     म्हणून आता वेळ आली आहे की चला एकत्र येऊ आणि आपल्या नैसर्गिक पर्यावरणाचे कोणत्याही किंमतीत रक्षण करण्याची प्रतिज्ञा करू कारण आपण असे केले नाही तर कोणीही आणि आपल्या पुढच्या पिढीला याचा फटका सहन करावा लागेल. आपण प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला 'नाही' म्हणू आणि केवळ आपल्या ग्रहावरील जीवसृष्टीच नव्हे तर आपले नैसर्गिक नैसर्गिक वातावरण देखील जपू ज्यामुळे आपले अस्तित्व किमतीचे बनते.

निबंध क्रमांक २

प्लास्टिक प्रदूषण मराठी निबंध | essay on plastic pollution.

     तर मित्रांनो, माझ्या या निबंधामार्फत मी तुमचे लक्ष पुन्हा या गंभीर चिंतेकडे वेधू इच्छितो जेणेकरून आपण आपल्या पर्यावरणास गांभीर्याने घेण्यास सुरवात करू आणि ते जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. प्लॅस्टिक ही एक आश्चर्यकारक सामग्री आहे जी दररोज अनेक गोष्टींसाठी वापरली जात आहे, परंतु ती आपल्या पर्यावरणाला खूप प्रदूषित करते.

     हे सांगण्याची गरज नाही की प्लास्टिक हा समुद्रातील प्राण्यांमध्ये आणि समुद्रात आढळणारा सर्वात विषारी कचरा आहे. प्लास्टिक निसर्गासाठी विषारी आहे कारण ते खंडित होण्यास नकार देते. प्लास्टिक सामग्री, जी रस्त्याच्या कडेला किंवा जलाशयांवर टाकली जाते, 

     प्लास्टिक निष्काळजीपणे फेकल्याने प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. प्लॅस्टिकची पिशवी समुद्री कासवासारख्या अंधाधुंध फीडरला आकर्षक जेलीफिशसारखी दिसत असली, तरी आपल्या सर्वांना माहित आहे की, प्लास्टिक अजीर्ण आहे.  आतड्यांसंबंधी अडथळा आणू शकते किंवा प्राण्यांना संसर्ग पसरवू शकते. मग प्लास्टिकची पिशवी आउटबोर्ड इंजिनच्या कूलिंग सिस्टीमला चोक करू शकते.

     आजकाल, प्लास्टिक प्रदूषणाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे पॉलीविनाइल क्लोराईड (पीव्हीसी). जेव्हा वर नमूद केलेल्या प्लास्टिक कंटेनरमध्ये रक्त किंवा कोणतीही अन्न सामग्री जतन केली जाते, तेव्हा हळूहळू विरघळणारी रसायने कर्करोगामुळे मृत्यूला कारणीभूत ठरतात आणि इतर त्वचा रोगांनाही कारणीभूत ठरतात.

असेही म्हटले जाते की पॉलीव्हिनिल क्लोराईड प्राण्यांची श्वसन प्रणाली नष्ट करते, ज्यात त्यांच्या प्रजननक्षमतेचा समावेश होतो. जेव्हा पाण्यात मिसळले जाते, तो पक्षाघात, त्वचेला जळजळ आणि हाडांचे नुकसान होऊ शकतो.

     प्लास्टिकचा वापर केला जातो कारण ते सहज उपलब्ध आणि स्वस्त असतात, जे दीर्घकाळ टिकू शकतात. दुर्दैवाने, प्लास्टिकची ही विशेष वैशिष्ट्ये आपल्याला त्यांच्यावर खूप अवलंबून असतात आणि प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण करतात. प्लास्टिक स्वस्त असल्याने ते वारंवार वापरले जाते आणि पुन्हा पुन्हा फेकले जाते, ज्याच्या चिकाटीमुळे आपल्या पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. मोठ्या शहरांमध्येही प्लास्टिक प्रदूषणाच्या स्वरूपात शहरीकरण वाढले आहे.

     स्वच्छ शहर, ग्रीन सिटी मोहीम सुलभ करा, ज्यामध्ये आमचे मुख्य उद्दीष्ट लोकांना कागद आणि ज्यूटपासून बनवलेल्या प्लास्टिक आणि पर्यावरणास अनुकूल कॅरी बॅग्स सोडून देण्याचे आवाहन करणे आहे.

त्यांचा वापर तीव्र करण्याऐवजी लोकांचे अवलंबित्व वाढत आहे. आपण खरेदीला जाऊ किंवा दुकानातून एखादी छोटी वस्तू खरेदी करू, आम्ही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सर्वकाही घेऊन जातो, जे अत्यंत निराशाजनक आहे. हे सांगण्याची गरज नाही की त्याचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

     प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवा आणि खरेदी करताना फक्त कागदी किंवा कापडी पिशव्या घेऊन जा. तसेच, कृपया घरी प्लास्टिकच्या पिशव्या आणणे टाळा आणि प्रत्येकाला असेच करण्यास प्रोत्साहित करा, तसेच इतक्या पॅकेजिंगसह येणारी उत्पादने टाळा. असे प्रयत्न प्लास्टिकच्या प्रदूषणावर लक्ष ठेवून आपल्या पर्यावरणाला अनुकूल करतील जे एकदा केले की पूर्ववत केले जाऊ शकत नाही, याचा अर्थ त्याचे हानिकारक परिणाम अपरिवर्तनीय आहेत.

     शेवटी, मला असे म्हणायचे आहे की प्लास्टिक ही समस्या नाही, परंतु त्याचा अतिवापर एक मोठी समस्या निर्माण करू शकतो आणि म्हणून आपण स्वतःला थांबवले पाहिजे, तसेच इतरांना त्यांचा वापर नियंत्रित करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि ते निष्काळजीपणे येथे फेकले जाऊ नये. .

तर मित्रांनो ! " प्लास्टिक प्रदूषणावर मराठी निबंध | Essay on Plastic Pollution in Marathi " निबंध तुम्ही प्ला स्टिकच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम मराठी निबंध , प्लास्टिक प्रदूषण आणि पर्यावरण निबंध मराठी , प्लास्टिक प्रदूषण आणि समुद्री जीवन निबंध मराठी म्हणूनही वाचन करु शकता.हे निबंध वाचून तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

'प्लास्टिक प्रदूषण वर मराठी निबंध i essay on plastic pollution in marathi " यामध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा..

Sujata Patil

Sujata Patil

0 comments:.

IMAGES

  1. जल प्रदुषण वर मराठी निबंध Best Essay On Water Pollution In Marathi

    water pollution essay in marathi

  2. जल प्रदूषण वर निबंध मराठी । Marathi Essay On Water Pollution

    water pollution essay in marathi

  3. जल प्रदुषण मराठी निबंध, Essay On Water Pollution in Marathi

    water pollution essay in marathi

  4. जल प्रदूषणाची संपूर्ण माहिती Water Pollution Information In Marathi

    water pollution essay in marathi

  5. जल प्रदूषण मराठी निबंध Essay on Water Pollution in Marathi

    water pollution essay in marathi

  6. जल प्रदूषण वर मराठी निबंध Essay on water pollution in Marathi

    water pollution essay in marathi

VIDEO

  1. Essay on water pollution || Water Pollution Essay #essay #shorts

  2. प्रदूषण एक समस्या || Pollution essay Marathi || Essay || speech

  3. Essay on Water Pollution in english//Water pollution essay/200 words essay on water pollution

  4. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  5. पाणी वाचवा जीवन वाचवा 10 ओळी निबंध मराठी ॥ Marathi nibandh pani vachva jivan vachva

  6. पहिला पाऊस मराठी निबंध / Paus marathi essay

COMMENTS

  1. जल प्रदुषण मराठी निबंध, Essay On Water Pollution in Marathi

    रविचंद्रन अश्विन माहिती मराठी, Ravichandran Ashwin Information in Marathi; जल प्रदुषण मराठी निबंध, Essay On Water Pollution in Marathi; माझी शाळा मराठी निबंध, My School Essay in Marathi

  2. जल प्रदूषण वर निबंध मराठी । Marathi Essay on Water Pollution

    जल प्रदूषण वर निबंध मराठी । Marathi Essay on Water Pollution. प्रस्तावना : आपल्या आजू- बाजूला आज प्रदूषणाने मोठे संकट पसरलेले आहे.

  3. जल प्रदूषण वर १० ओळीत मराठी निबंध

    10 Lines on Diwali in Marathi. 10 Lines on Save Water Essay in Marathi. 10 Lines Essay On Tree in Marathi. 10 Lines On Good Habits In Marathi. 10 Lines on Pollution in Marathi Essay. 10 Lines on My Mother in Marathi. 10 lines Holi Essay in Marathi For Students. 10 Lines and Sentences on Water Pollution in Marathi Set - 4

  4. Water Pollution Information in Marathi Essay

    Water Pollution in Marathi Jal Pradushan Marathi Essay Project : जल प्रदूषण निबंध जल प्रदूषण म्हणजे जलाशयांचे साठे उदा. तलाव, नद्या, समुद्र, विहीर, कालवे, सरोवरे इत्यादींचे पाणी दुषित होणे होय ...

  5. जल प्रदूषण कारणे, परिणाम व उपाययोजना : Water pollution

    जल प्रदूषण समस्या प्रस्तावना - Water pollution : मानवाच्या ...

  6. जल प्रदूषण मराठी माहिती: उद्दिष्टे, विश्लेषण, समस्या, कारणे, कार्यपद्धती

    जल प्रदूषण विश्लेषण मराठी माहिती (Water Pollution Analysis Marathi Information), जल प्रदूषण समस्या (Water pollution problem in Marathi), जल प्रदूषण महत्व, जल प्रदूषण कारणे मराठी ...

  7. जल प्रदूषणा विषयी संपूर्ण माहिती

    Water Pollution Information in Marathi, or Meaning, Causes & Solution of Water Pollution & More Information about Jal Pradushan in Marathi Wednesday, June 26, 2024 करिअर

  8. जल प्रदुषण वर मराठी निबंध Best Essay On Water Pollution In Marathi

    जल प्रदुषण वर मराठी निबंध Essay On Water Pollution In Marathi. पृथ्वीवरील ताजे पाणी जीवनाचे सर्वात महत्वाचे स्रोत आहे. कोणतीही जीवित वस्तू दिवसभर ...

  9. जल प्रदूषण वर मराठी निबंध Essay on water pollution in Marathi

    Marathi Essay; Banking; GK; MARATHI VYAKARAN; ... जल प्रदूषण वर मराठी निबंध Essay on water pollution in Marathi. July 29, 2022 July 30, 2022 by ppsaath. जल प्रदूषण वर मराठी ...

  10. जल प्रदूषण प्रोजेक्ट मराठी

    वायु प्रदूषण निबंध | Air pollution essay in marathi . ध्वनी प्रदूषण | Sound Pollution in Marathi. ... Causes of water pollution in Marathi. जल प्रदूषण म्हणजेच नद्या, तलाव, महासागर, भूजल व अगदी ...

  11. जल प्रदूषणाची संपूर्ण माहिती Water Pollution Information In Marathi

    जल प्रदूषणाचे प्रकार | Types Of Water Pollution In Marathi. जल प्रदूषणाचे 3 मुख्य प्रकार आपल्या समोर ज्यांचे नाव खालील प्रमाणे आहेत. 1) रासायनिक जल प्रदूषण ...

  12. पाणी मराठी निबंध

    वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता. जल पाणी मराठी निबंध दाखवा / Pani Marathi Nibandh Dakhva. पाणीवर मराठी निबंध सांगा / Water Essay in Marathi 100 words. पाण्यावर ...

  13. प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Pollution In Marathi

    Essay On Pollution In Marathi नमस्कार मित्रांनो ! आज मी तुम्हाला प्रदूषण वर मराठी मध्ये निबंध लिहून देणार आहोत . हा निबंध वेगवेगळ्या शब्दांत लिहिल्या गेलेला

  14. जलसंधारण निबंध मराठी Water Conservation Essay in Marathi

    Water Conservation Essay in Marathi जलसंधारण निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये ...

  15. जल प्रदूषण (Water pollution)

    Water pollution बद्दल माहिती प्रशंसनीय आहे, हि बाब सामान्य जनतेला समजून सुद्धा काही करता येत नाही.

  16. जल प्रदूषणाची संपूर्ण माहिती Water Pollution Information In Marathi

    water pollution information in Marathi पाणी (जल) म्हणजे जीवन होय. आपल्या सूर्य मालिकेत पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे.

  17. प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)

    मोठी समजूतदार मंडळी तर अगदी वैज्ञानिक दृष्टीकोन मांडून 'प्रदूषणाचे विकराळ रूप आपल्या समोर मांडतील. - Marathi essay on pollution

  18. पाणी अडवा पाणी जिरवा माहिती व निबंध

    पाणी वाचवण्याची आवश्यकता pani vachava in marathi. मनुष्य हा अन्ना शिवाय 3 आठवडे जगू शकतो पण पाण्या शिवाय 2-3 दिवसच जिवंत राहू शकतो.

  19. जल प्रदूषण घोषवाक्ये, Water Pollution Slogans in Marathi

    मला आशा आहे की आपणास वन्यजीव मराठी घोषवाक्ये हा मराठी माहिती निबंध लेख (water pollution slogans in Marathi) आवडला असेल.

  20. वायू प्रदूषण मराठी माहिती

    Air Pollution Information in Marathi वायू प्रदूषण मराठी माहिती बद्दल जाणून घ्या संपूर्ण. आजच्या जगात वायू प्रदूषण Air Pollution ही एक मोठी चिंताजनक बाब आहे.

  21. Water Pollution Essay In Marathi

    Stuck on writing Water Pollution Essay In Marathi? Find thousands of sample essays on this topic and more.

  22. ESSAY ON PLASTIC POLLUTION IN MARATHI

    'प्लास्टिक प्रदूषण वर मराठी निबंध I Essay on Plastic Pollution in Marathi "यामध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

  23. Water Pollution Essay In Marathi Wikipedia

    Water Pollution Essay In Marathi WikipediaWater Pollution Essay In Marathi Wikipedia 2. Essay on Feasibility of Geothermal Energy in the United... Feasibility of Geothermal Energy in the United States Abstract Over the past years, gasoline and electricity have been the leading energy resources. The search for an alternative source of energy has ...